“रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” दूरदर्शनवर (Vdo क्लिप)

ABP Majha

“रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” दूरदर्शनवर

एबीपी माझा TV – ब्लॉग माझा पुरस्कार सोहळा 

                       एबीपी माझा TV व्दारा नोव्हेंबर २०१२ मध्ये ब्लॉग माझा-४ या जागतीक ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत माझ्या “रानमोगरा” या ब्लॉगला पुरस्कार मिळाला. 

               माझ्या “रानमोगरा” (https://gangadharmute.wordpress.com/) या ब्लॉगला सलगपणे दुसर्‍यांदा हे पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाल्यानंतर २७ जानेवारी २०१३ रोजी एबीपी माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-४ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याच्या समारंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे एबीपी माझा TV वर दिनांक ०३ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रक्षेपण करण्यात आले. 

दिनांक – रविवार, ३ फेब्रुवारी २०१३

वेळ – दुपारी १२.३० वा.

चॅनेल – एबीपी माझा




 “रानमोगरा” विषयी प्रसारीत झालेली ३.१९ मिनिटांची VDO क्लिप 
——————————————————————————————————————

ABP Majha
परिक्षकासोबत विजेत्यांचा ग्रूप फ़ोटो
*
————————————————————————————————————

एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती

Blog Majha
एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती

                एबीपी माझा या मराठी सॅटेलाइट दूरदर्शन वाहिनीने आयोजित केलेल्या ‘ब्लॉग माझा २०१२’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण आणि सोबतच एबीपी माझाच्या टेलीकास्टींगसाठीच्या एपीसोड शूटींगचा कार्यक्रम मुंबई येथील बोस्टन हाऊस, सुरेन रोड, लँडमार्क बिल्डींगजवळ, दर्पण टॉकीज चौक, अंधेरी पूर्व येथे तारीख २७ जानेवारी २०१३, रविवारला सकाळी ११ ते दुपारी ४.३० च्या दरम्यान पार पडला. सदर कार्यक्रमाचे लवकरच  एबीपी माझा या मराठी सॅटेलाइट दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारण केले जाईल.
                मराठी ब्लॉगर्सना व्यासपीठ मिळवून देणारी ‘ब्लॉग माझा’ ही मराठीतली एकमेव अभिनव स्पर्धा आहे. न्यू मीडियामुळे आपल्या मराठी भाषेसमोर संधी आणि आव्हानं उभी होत आहेत. या आव्हानांचं रूपांतर संधीत करण्याचा आणि या ब्लॉगसारख्या माध्यमातील मराठीला, मराठी लेखनाला व मराठी सृजनशीलतेला दाद देण्याचा उपक्रम म्हणजे ‘ब्लॉग माझा’! यंदाही या उपक्रमाला मराठी ब्लॉगर्सनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे परिक्षक असणारे दै.’महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक श्री. अशोक पानवलकर, मराठी अभ्यास केंद्राचे संचालक श्री. दीपक पवार आणि युवा नाटककार व लेखिका इरावती कर्णिक यांच्या समोर विजेते ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान होतं. ते आव्हान निभवतांना परिक्षकांनी काय निकष  ठेवलेत, निवड प्रक्रिया कशी किचकट होती याविषयी
Blog Majha


परिक्षक पॅनेल मधले एक परिक्षक श्री दिपक पवार ह्यांच्याशी दिलखुलास चर्चा झाली. एकंदरीत मजा आली.

              १५ विजेत्यांपैकी १२ विजेते स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधता आला. “ब्लॉग माझा-३” या २०१० मधील स्पर्धेत विजेते ठरल्यापैकी श्री नरेंद्र गोळे, श्री एकनाथ मराठे आणि मी स्वत: या वेळी सलग दुसर्‍यांदा विजेते ठरलो असल्यामुळे त्यांच्याशी माझा जुना परीचय आणि मैत्री असल्यामुळे त्यांच्याशी संवाद तर झालाच पण यावेळेस नव्यानेच आलेल्यांशीही संवाद साधता आला. आंतरजालावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सोकाजीराव त्रिलोकेकर म्हणजे ब्रिजेश मराठे होय, हे सुद्धा कळून आले. सुलक्षणा लक्ष्मण प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. श्रेया महाजन यांचेकडून आणखी बरेचकाही शिकण्यासारखे आहे, याची जाणिव झाली. रोहन जगताप, तन्मय कानिटकर, प्रशांत रोटवदकर आणि इतर विजेत्यांशी संवाद साधण्याची इच्छा वेळेअभावी अपूर्णच राहिली.

                          एबीपी माझाचे असो-सिनिअर प्रोड्युसर-  अँकर, नावाप्रमाणेच सदोदित प्रसन्न भासणारे प्रसन्न 

जोशी, यांनी सर्वांचा परिचय करून घेतल्यानंतर ‘ब्लॉग माझा २०१२’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आपापल्या ब्लॉगची माहिती सांगण्याची प्रत्येकी २ मिनीटांची ‘बाइट’, अश्या तर्‍हेने कार्यक्रमाचे शूटींग व रेकोर्डिंग करायचे असल्याची माहिती दिली. कुणी कुठे-कसे उभे राहायचे, कुठून चालायला सुरूवात करायची, प्रमाणपत्र स्विकारल्यानंतर कशी “पोझ” घ्यायची, अशा तर्‍हेच्या जुजबी सुचना देऊन शूटींग व रेकोर्डिंगला सुरूवात झाली.   
Vinod Kambli
विनोद कांबळी

            दरम्यानचे काळात प्रसिद्ध माजीक्रिकेटपटू विनोद कांबळी स्टुडियोत पोचले. त्यांचेशी प्रत्यक्ष भेट  होणे याचा आनंद  काही वेगळाच होता. विनोद कांबळी म्हणजे माझा सर्वाधिक आवडता खेळाडू. अगदी सचीन तेंडूलकर पेक्षाही माझा जीव कांबळीमध्येच जास्त गुंतायचा. सचीनची महानता मला निर्विवाद मान्य असूनही मी कांबळीवरच जास्त प्रेम का केले, याचे उत्तर मला तेव्हाही माहीत नव्हते आणि आजही मला बिनतोड स्पष्टीकरण देता येत नाही. मात्र एकेकाळी कांबळी माझा “जीव की प्राण” होता, हे नाकारण्यातही अर्थ नाही. त्याला टीममधून वगळल्यावर मला किती वेदना व्हायच्या, हे शब्दात सांगणे कठीण आहे. सचीन नावाच्या विक्रमांच्या बादशाहने एक-एक शिखर पादाक्रांत करत एकदिवसीय क्रिकेटमधील स्वप्नवत दोनशे धावांचा पल्ला गाठला तेव्हा सलाम नाबाद २००! – तुंबडीगीत हे तुंबडीगीत मी उत्स्फ़ूर्तपणे लिहिले; तसे एखादे गीत कांबळीवर अजूनपर्यंत तरी माझ्या हातून लिहिले गेले नाही. मात्र यानिमित्ताने कांबळीसोबत जवळून भेटण्याचा जो योग आला तो क्षण माझ्या कायमच स्मरणात राहील.

                  कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच दिवशी प्रमोद देव साहेंबाच्या मुलीचे लग्न होते. शूटींगचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नातही जाता आले. अक्षता टाकण्याचा मुहूर्त उलटून गेला असला तरी भोजनाचा कार्यक्रम ऐन बहारात होता. मलाही त्यानिमित्ताने अक्षता न टाकताच भोजनाचा अर्थात “पंचावन्नपक्वानाचा” यथेच्छ समाचार घेता आला.

              योगायोग बघा, १४ जानेवारी २०१३ला मी “शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)” ही हजल लिहिली त्यातील एक शेर असा आहे.

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

आणि ……………. १३ दिवसातच आयुष्यात पहिल्यांदाच अगदी तशीच वेळ माझ्यावर आली. 🙂






Goa
प्रसन्न जोशी सोबत लेखक
                     मुंबईपासून माझ्या गावाचे अंतर जवळपास ८०० किलोमीटर. एवढे अंतर चालून कार्यक्रमाला जायचे किंवा नाही असा प्रश्न माझ्यासमोर उद्भवलाच नाही. कार्यक्रमाला जायचेच हा विचार आधीच पक्का झाला होता. त्यामुळे प्रसन्न जोशींची १२ जानेवारी २०१३ रोजी मेल येताच आणि प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रम १० फेब्रुवारी २०१३, रविवारला आयोजित केला आहे हे कळताच रेल्वे आरक्षण वगैरे उरकून घेतले. पण एक घोळ झाला. पुन्हा प्रसन्न जोशींची मेल आली आणि कार्यक्रमाच्या तारखेत बदल होऊन १० फेब्रुवारी २०१३ ऐवजी २७ जानेवारी २०१३ ला होणार असल्याचे कळल्याने थोडी तारांबळ उडाली. आता ऐनवेळेवर रेल्वे आरक्षण मिळेल काय, वेटींग मिळाले तर कन्फ़र्म होईल काय, सारे प्रश्नच प्रश्न. शेवटी निर्णय झाला की थेट चारचाकी वाहनानेच जायचे. भटकंती करत जायचे. कोकणात खूप खोलवर घुसायचे, तेथील जीवनशैली न्याहाळत गोवा-रत्नागिरी मार्गे मुंबईला पोचायचे. पण पुरेसा वेळ नसल्याने इष्टमित्र-मंडळींशी आणि आंतरजालीय मित्रांशी फ़ारसा संपर्कच करता आला नाही. त्यामुळे भटकंतीचा उद्देश फ़सला नसला तरी फ़ारसा सफ़लही झाला नाही.
*   *   *   *

Pandharpur
चंद्रभागेच्या तिरी – पांडुरंग हरी

 *   *   *   *

Goa
देशी-विदेशी पर्यटकांचा आवडता कोलंगुट बीच, गोवा

*   *   *   *

Goa
मंगेश मंदीर, गोवा
*   *   *   *
Goa
कोलंगुट समुद्रकिनारा, गोवा
*   *   *   *
Goa
जुने गिरिजाघर, गोवा
*   *   *   *
Goa
दोना पौला, गोवा
*   *   *   *
Goa
किनारपट्टीवरील सुर्यास्त, गोवा
*   *   *   *
काजू
कोकणचा काजू (रत्नागिरी)*   *   *   *

‘ब्लॉग माझा-२०१२’ स्पर्धा – विजेता रानमोगरा

‘ब्लॉग माझा-२०१२’ स्पर्धेचा निकाल जाहीर


  ‘एबीपी माझा’ या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे जगभरातल्या मराठी भाषिक ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “ब्लॉग माझा” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत कुवैत ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर अशा विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे निकाल जाहीर करण्यांत आलेले आहेत.


          मराठी ब्लॉगर्सना व्यासपीठ मिळवून देणारी ‘ब्लॉग माझा’ ही मराठीतली एकमेव अभिनव स्पर्धा आहे. न्यू मीडियामुळे आपल्या मराठी भाषेसमोर संधी आणि आव्हानं उभी होत आहेत. या आव्हानांचं रूपांतर संधीत करण्याचा आणि या ब्लॉगसारख्या माध्यमातील मराठीला, मराठी लेखनाला व मराठी सृजनशीलतेला दाद देण्याचा उपक्रम म्हणजे ‘ब्लॉग माझा’! यंदाही या उपक्रमाला मराठी ब्लॉगर्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

        मराठी ब्लॉगच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यार्‍या ब्लॉगमधून उत्कृष्ठ आणि दर्जेदार ब्लॉग निवडीसाठी परीक्षक म्हणून असणारे दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक श्री. अशोक पानवलकर, मराठी अभ्यास केंद्राचे संचालक श्री. दीपक पवार आणि युवा नाटककार व लेखिका इरावती कर्णिक यांच्या समोर मराठी ब्लॉग्ज विश्वामधून फक्त पंधरा ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान होतं.
     या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – माझी वांङ्मयशेती” (https://gangadharmute.wordpress.com) या ब्लॉगचाही समावेश आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मराठी ब्लॉगर्सचे आणि विजेत्या ब्लॉगर्सचे मनापासून अभिनंदन! 

प्रथम पसंतीचे पाच ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग
1. सुलक्षणा लक्ष्मण-  http://mrugtrushna.blogspot.in  
2. सागर पाटील-  http://bhurata.blogspot.com
3. नरेंद्र गोळे-  http://nvgole.blogspot.in/
4. विद्या कुलकर्णी- http://asvvad.blogspot.in/
5. युवराज गुर्जर-  http://ygurjar.blogspot.in/

उत्तेजनार्थ निवडलेले दहा ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग

1. अवधूत- http://ekregh.blogspot.in/
2. गंगाधर मुटे- https://gangadharmute.wordpress.com
3. प्रशांत रोटवदकर- http://athirstymanmad.blogspot.in/ 
4. तन्मय कानिटकर-  http://tanmaykanitkar.blogspot.in/
5. रोहन जगताप- http://anudini.in
6. प्रसाद इनामदार- http://prajkta-prajkta.blogspot.in
7. ब्रिजेश मराठे-  http://brijeshmarathe.wordpress.com/
8. एकनाथ मराठे- http://ejmarathe.blogspot.com
9. श्रेया महाजन- http://shreya4mahajan.blogspot.com/
10. विजय लाले- http://barmahi.blogspot.in/

(प्रथम पसंतीचे पाच ब्लॉग्ज आणि उत्तेजनार्थ दहा ब्लॉग्ज हे दोनच गट आहेत. या गटातील क्रमवारी म्हणजे गुणानुक्रम नाही.)

                       विजेते ब्लॉगर्स यांच्या कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे एपिसोड रेकॉर्डिंग मुंबई येथील ‘एबीपी माझा’ टीव्हीच्या स्टुडियो मध्ये होणार असून या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम ‘एबीपी माझा’ टीव्हीच्या खास एपिसोडमध्ये प्रसारीत केला जाणार आहे.
—————————————————————————————————————————————–
नुकताच श्री.प्रसन्न जोशी, ए.बी.पी.माझा ह्यांनी ई-मेलद्वारे वरील निकाल कळविलेला आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!


श्री.प्रसन्न जोशी आणि ए.बी.पी.माझा वाहिनी ह्यांचे हार्दिक आभार!

या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – माझी वांङ्मयशेती” (https://gangadharmute.wordpress.com) या ब्लॉगचाही समावेश आहे.
मराठी ब्लॉगर्स आणि ब्लॉग लेखनास प्रोत्साहन देण्याचे काम ते गेल्या चार वर्षांपासून करत आहेत ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे!
सर्व परीक्षक मंडळी आणि ए.बी.पी.माझा टीव्हीच्या चमुचा मी आभारी आहे.

                                                                                                                – गंगाधर मुटे
——————————————————————————————————————————————–

मी मराठी – स्पर्धा विजेती कविता

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे…!

                                                                               गंगाधर मुटे
—————————————————————————-
कविता/गझल                                                    वृत्त – सुमंदारमाला
लगावली – लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
—————————————————————————-

                   १ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट (http://www.mimarathi.net) ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी प्रवेशिका भाग घेतला होता.
                  या स्पर्धेचा आज दि. १० सप्टेंबर २०११ रोजी निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत माझी वरील कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? ही  कविता प्रथम क्रमांक विजेता ठरली आहे.
             दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या माझ्यासारख्या  एका शेतकरी माणसाची कविता पुरस्कृत करून माझ्यामध्ये या स्पर्धेने एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.
             त्याबद्दल  माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने राज जैन यांना,  ज्येष्ठ पत्रकार-लेखक-गझलकार असलेले परीक्षक श्री प्रदीप निफाडकर यांना,  तसेच
            माझ्या कवितेला फुलविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या तमाम आंतरजालावरील प्रतिसादकांना
मी मन:पूर्वक अभिवादन करतो. 🙂
                                                                                                                         – गंगाधर मुटे

———————————————————————————————————————–

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
                    मुंबईतील ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्थेच्या या वर्षीच्या सामाजिक क्षेत्रासाठी असलेल्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी, निवड समितीने शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांची निवडक केली आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्‍यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, त्या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानच्या यंदाच्या सामाजिक ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी श्री. शरद जोशींची निवड करीत असल्याचे निवड समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

                   शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार या निवडीमागे असल्याचे समितीने म्हटले आहे.

                        डॉ. अरुण टीकेकर अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले.

                         मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरकार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला आहे.

                       हा पुरस्कार स्वीकारण्यास श्री. शरद जोशी यांनीही सानंद संमती दिली असून डिसेंबर २०११ मध्ये मुंबईत होणार्‍या चतुरंग रंगसंमेलनात श्री. शरद जोशी यांना तो प्रदान करण्यात येईल.

——————————————————————————————————

स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo





स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo

स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.

———————————————————————–

———————————————————————–
अन्य व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

———————————————————————–

………………………………………………………………………………….

ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.

ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.

        स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.

चॅनेल : स्टार माझा TV मराठी
दिनांक : २७-०३-२०११
वेळ : सकाळी ९ वाजता

……………………………………………………..
त्या निमित्ताने दि. २६-०३-२०११ ला प्रसारीत करण्यात आलेली स्टार माझावर झलक.



मीमराठी बक्षिस समारंभ


मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट (
http://www.mimarathi.net 
यांच्या संयुक्त विद्यमाने “लेखन स्पर्धा २०१०” ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
अधिक माहिती या दुव्यावर मिळेल. http://www.mimarathi.net/node/5216
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या ललित लेखाला पारितोषक मिळाले आहे.
………………………………………………
हा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.

……………………………………………..

या स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.
स्पर्धेसाठी 
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
……………..

१९ मार्च रोजी लेखन स्पर्धा २०१०-२०११ बक्षिसं समारंभ ठाणे येथे संपन्न झाला,

दिवस : १९ मार्च, २०११.
वेळ : ४.०० ते ७.०० संध्याकाळी.
पत्ता :
लक्ष्मी केशव मंगल कार्यालय, प्रताप सिनेमा समोर, कोलबाड रोड, खोपट, ठाणे (प).

…………………

लेखन स्पर्धा बक्षिस समारंभाची काही – क्षणचित्रे

(सर्व छायाचित्र श्री रोहन चौधरी आणि मी मराठी डॉट नेट च्या सौजन्याने.)



****


******

कॅम्पस परिवार स्नेहसमारंभ

कॅम्पस परिवार सत्कार समारंभ – आर्वी (छोटी)

दिनांक – २० जानेवारी २०११
———————————————–
Campus
Arvi
Arvi chhoti
Gangadhar Mute
farm House
Farm
Arvi
Campus
—————————————————————————————————-

पुरस्काराचा भुलभुलैय्या

पुरस्काराचा भुलभुलैया
 
                “स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा.  
               शक्यतो कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. घेतलाच तर त्याचा निकाल कसाही लागो, नंबर येवो अथवा ना येवो, दोन्ही स्थितीमध्ये ना आनंद मानायचा ना दु:ख. अशी मानसिक तयारी करून तसा फार पूर्वीच निर्णय घेतला आहे मी. पण जेव्हा जेव्हा हा निर्णय अमलात यायची वेळ येते तेव्हा तेव्हा मात्र अगदी विचित्र परिस्थिती निर्माण होत असते. मी आणि माझे मन/शरीर या दोन स्वतंत्र ‘संस्था’ आहेत, याची पुरेपूर जाणीव होत असते. कारण मी जे ठरवतो त्यानुरूप वागण्यास मन अजिबात तयार नसते. ‘इंद्रियावर ताबा’ ठेवण्याचे निश्चय सामान्य माणसाला पाळणे तसेही कठीणच काम असते. किंवा असेही म्हणता येईल की, अशा तर्‍हेचे निश्चय करून ते अंगवळणी पाडणे, हे सामान्य माणसाच्या दृष्टीने महाकठीणच असते. फक्त या निमित्ताने मनावर थोडाफार ताबा मिळवता येऊन आचाराविचारावर थोडेफार नियंत्रण मिळवता येते, एवढाच काय तो आनंद.
                  या विषयावर काथ्याकूट करण्याचे कारण असे की, बर्‍याच कालावधीनंतर या तीन महिन्यांच्या कालावधीत मी दोन स्पर्धांमध्ये भाग घेतला. एका स्पर्धेत अपयश आणि दुसर्‍या स्पर्धेत यश. पहिल्या स्पर्धेत जेव्हा अपयश मिळाले तेव्हा थोडीफार नाराजी आलीच. प्रयत्न करूनही नाराजी जाईना. दु:ख मानायचे नाही, हा माझा आदेश माझेच मन स्वीकारेना. मी माझ्या मनाला परोपरी समजावण्याचा प्रयत्न केला, मनासमोर मी तर्‍हेतर्‍हेचे तर्क सादर केले, पण सारे व्यर्थ. मनाची उदासी जैसे थे. मग मनाच्या नाराजीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक बाब लक्षात आली की, नाराजी यश मिळाले की अपयश याबाबतची नसून परीक्षकाने मर्यादा ओलांडून निष्कारण आपल्या कलाकृतीला ‘कचरा’ ठरवून जाणूनबुजून हीनत्वाची वागणूक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मनाच्या उदासीचे हे कारण मात्र पटण्यासारखे वाटले. मग पुन्हा मी माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला.

मी : हे बघ मना, असल्या बारीकसारीक क्षुल्लक बाबींना एवढे महत्त्व द्यायचे काहीच कारण नाहीये.
मन : बारीकसारीक? क्षुल्लक? येथे चक्क उपमर्द होतोय, आणि तुला काहीच कसे वाटत नाही?
मी : हे बघ मना, तुला जे वाटते तेच खरे असेल कशावरून? त्याला दुसरी बाजूही असू शकते आणि ती खरी असू शकते.
मन : दुसर्‍याला हीन लेखने ही एक विकृती आहे, आणि तिचे समर्थन केले जाऊ शकत नाही.
मी : हे बघ मना, माणूस म्हटलं की चूकभूल होतच राहणार.
मन : नकळत किंवा अनवधाने घडते त्याला भूलचूक म्हणायचे असते. जाणीवपूर्वक केलेल्या कृतीला भूलचूक म्हणता येत नाही. अशी कृती क्षम्य सुद्धा असू शकत नाही.
मी : ते जाऊ दे, पण परीक्षकाबद्दल आणि श्रेष्ठ व्यक्तीबद्दल आदर बाळगायचा असतो, ही साधी बाब तुझ्या कशी लक्षात येत नाहीये?
मन : तीच तर खरी ग्यानबाची मेख आहे रे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. माणसांनाच काय, गाय हे जनावर असूनही तिच्याकडे आदराने बघायला शिकविलेना आम्हाला आमच्या संस्कृतीने. पण आदर राखूनही अवहेलनेचे शल्य तसूभरही कमी होत नाहीये.
                 अर्थातच कारण काहीही असो, आलेला प्रसंग पचवणे कठीण गेलेच. आपणच स्वमर्जीने केलेला निश्चय, आपल्यालाच पुरेपूर पाळता आला नाही, हे अधोरेखीत झाले.
 *   *   *
           प्रसंग दुसरा. आता विजेत्याच्या यादीमध्ये माझे नाव होते. मी निश्चयाप्रमाणे तसा मख्खच होतो. पण मनामध्ये मात्र आनंदाचा एक तरंग उठलाच होता. मात्र हा आनंदाचा तरंग “आपण जिंकलो” या भावनेतून अजिबात आला नव्हता. आपली दखल घेतली गेली, उपेक्षितांच्या भावनांना समजून घेणारेही आहेत, याबद्दल मिळालेल्या पावतीचा तो आनंदक्षण होता. त्यामुळेच यादीत नाव पहिले की शेवटले, याबद्दलही सोयरसुतक उरले नव्हते.
           मी काय लिहितो,कसे लिहितो, याचे मला भान आहे. माझे लेखन बहूसंख्यजनांना न रुचणारे, न पटणारे किंवा अनाकलनीय असू शकते, याची मला जाणीव आहे. कधीकधी तर क्रित्येकाच्या भावना दुखावणारे, तडाखे,चटके देणारे असू शकते, हेही ज्ञात आहे मला. पण नाईलाज आहे, वास्तव हे कटू असले तरी ते वास्तव असते, आणि मी ते टाळू शकत नाही. लेखन करतो म्हणून लेखक आणि कविता लिहितो म्हणून कवी, एवढंच माझं लेखक व कवी या शब्दांशी नातं. एरवी लेखक, कवीसाठी लागणारी योग्यता माझ्यात आहे किंवा नाही, मलाच संशय आहे. कारण मी कल्पनाविलासात फार काळ रमू शकत नाही. लोकांना रुचावे, दाद मिळावी, आपल्याला वाहवा मिळावी म्हणून त्या तर्‍हेने लेखन करण्याचे प्रयत्न मी करू शकत नाही.वाचक, रसिक, समिक्षक हा लेखकाच्या दृष्टीने देव असतो हे मान्य, पण त्यांचे फ़ाजिल लाड पुरविलेच पाहीजे, याबाबत मी सहमत होऊ शकत नाही. याउलट गरज असेल तेथे त्यांना दोन खडे बोल ऐकवण्याची कठोरता लेखकात असायलाच हवी, यावर मी ठाम आहे.लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे एवढ्यासाठी मी लिहू इच्छित नाही. केवळ उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणे, सिमित म्हणा की संकुचित म्हणा, पण एवढाच उद्देश माझ्या डोळ्यासमोर असतो, हे खरे आहे.
            उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणारे आजवर खूप झालेत. पण इतिहास असे सांगतो की, या तर्‍हेचे व्रत घेतलेली बरीचशी माणसे मध्येच भरकटली आणि शेवटी देवाच्या आळंदीची वाट चुकून चोराच्या आळंदीला पोचलीत. आणि त्यामागच्या अनेक कारणांपैकी ‘पुरस्काराची अभिलाषा’ हे एक प्रमुख कारण आहेच आहे. एकदा का पुरस्काराची इच्छा मनात जागृत झाली की सर्वांना रुचेल, पसंतीस पडेल असे लेखन लिहिण्याकडे कल झुकलाच समजावा. मग कटू, कठोर, तडाखे देणारे, दुष्प्रवृतीवर घाव घालणारे लेखन जन्माला घालणारी लेखनी स्वत्वाच्या विनाशाकडे वाटचाल करायला लागलीच असे निर्विवाद समजावे. मग पुरस्काराच्या भुलभुलैयात लेखनीची धार कधी आणि कशी बोथट झाली, याचा उलगडा भल्याभल्यांना होत नाही.
           जी चूक इतरांनी केली, तीच चूक माझ्याकडून होऊ नये,एवढे बळ विधात्याने मला द्यावे, आणि या प्रवासात पुरस्कार वगैरे मिळाले तर आनंदच आहे, पण नाही मिळाले तरी त्यात खेद वाटण्यासारखे काहीच नाही, आपला मार्ग तेवढा महत्वाचा, तो भरकटू नये, हीच धारणा मरेपावेस्तोवर कायम रहावी, त्यात अंतर येऊ नये, एवढीच आंतरीक इच्छा आहे.   

                                                                           गंगाधर मुटे
,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,

संदर्भ :
पहिली स्पर्धा – एक काव्यलेखन स्पर्धा.
दुसरी स्पर्धा – स्टार माझा स्पर्धा.