पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत

पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत

                कांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, “पिकलं तवा लुटलं, म्हणून देणंघेणं फ़िटलं” हे तत्व स्विकारून शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि राज्यात विलंबाने व अपुरा पाऊस झाल्याने राज्यातील शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटाची भिषणता लक्षात घेता शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती या प्रमूख तीन मागण्या ऐरणीवर आणून केंद्र सरकारला शेतकर्‍यांच्या आसूडाचा हिसका दाखविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिनांक ४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.

 सुमारे ३००० शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा हायवेवर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजुची वाहतुक पूर्णत: ठप्प झाली होती.

                तत्पुर्वी पिंपळगाव बसवंत येथील शगून मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतीसमोरिल समस्यांवर सविस्तर उहापोह करण्यात आला. सभेत देविदास पवार, अर्जूनतात्या बोराडे, निर्मलाताई जगझाप, तुकाराम बोबडे, अनिल घनवट, शैलजा देशपांडे, रवी देवांग, सरोज काशीकर, रामचंद्रबापू पाटील, गुणवंत पाटील हंगरगेकर, अड वामनराव चटप आणि शरद जोशी यांनी मार्गदर्शन केले.

                शेतीत चांगले उत्पादन झाले तर सरकार हमी भावाने खरेदी करण्यास पुढे येत नाही व शेतकर्‍यांना संरक्षण देत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना आपला माल मिळेल त्या किमतीत मातीमोल भावाने विकावा लागतो. मात्र कमी उत्पादन झाले आणि बाजारपेठेत तेजी यायला लागली की सरकार निर्यातबंदी करून किंवा निर्यातशुल्क वाढवून स्थानिक बाजारपेठेतील भाव पाडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. त्यामुळे दोन्ही स्थितीमध्ये शेतकरीच नाडवला जातो व उत्पादनखर्च भरून न निघाल्याने त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर आणखी वाढत जातो. शेतीवरील कर्ज हे शासकीय धोरणाचा परिपाक असून शेतीवरील कर्ज शासननिर्मित संकट आहे.

                दुर्धर रोगांवर नियमित घ्यावयाच्या औषधी महागड्या असतात व सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्तीच्या आवाक्याबाहेर असतात. गोरगरिबांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाही तर माणसे दगावतात आणि तरीही औषधांचा समावेश जीवनावश्यक कायद्यात केला जात नाही; याउलट कांदा आणि बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा न खाल्याने कोणीच मरत नाही किंवा जीव कासाविसही होत नाही तरी सुद्धा कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात टाकल्या गेलेले आहे. कांदा स्वस्त झाला पाहिजे म्हणून सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करते. यंदा कांद्यावरील निर्यातशुल्क केंद्रसरकारने प्रति टन शुन्य डॉलवरून ३०० डॉलर आणि ३०० डॉलरवरून ५०० डॉलर प्रति टन वाढवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी संपली असून निर्यातीत ९० टक्के एवढी घट आली आहे, परिणामत: देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भावही गडगडले आहेत.

सभेतील काही मुख्य निर्णय :

१) सभा संपताच तातडीने मुंबई-आग्रा हायवेवर रस्ता रोको आंदोलन

२) १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे लासलगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय.

३) रेलरोको आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी करणार

४) १० नोव्हेंबर २०१४ रोजी किंवा त्या तारखेच्या आसपास नाशिक येथे शेतकरी संघटनेचे अधिवेशन

५) चलो दिल्ली कार्यक्रम अधिवेशनात जाहीर होणार

मुख्य क्षणचित्रे :

१) शेतकर्‍यांचा प्रचंड उत्साह पाहून उर्जा मिळालेल्या शरद जोशी यांनी बर्‍याच कालावधीनंतर माईकसमोर उभे राहून तब्बल १३ मिनिटे भाषण केले.

२) शेतकरी समाजात चैतन्य संचरणे हेच मा. शरद जोशींच्या प्रकृतीसाठी रामबाण आणि एकमेव औषध आहे, हेच या घटनेतून अधोरेखीत झाले.

३) शगून मंगल कार्यालयात प्रचंड शेतकर्‍यांनी उपस्थिती लावल्याने हॉल खचाखच भरला होता. जागेअभावी शेकडो शेतकर्‍यांना बाहेर उभे राहूनच भाषण ऐकावे लागले.

४) पावसाची सर आली तरी शेतकरी जागेवरच शांतपणे उभे होते.

५) रस्ता रोको आंदोलनाची घोषणा न करताच मा. शरद जोशींनी भाषण संपवले तेव्हा उपस्थितांमध्ये बराच हलकल्लोळ झाला. आत्ताच तातडीचा रास्ता रोको जाहीर करून आम्हाला रस्ता रोखून धरण्याची परवानगी द्या, अशा घोषणांनी शेतकर्‍यांनी सभागृह दणाणून सोडले.

६) उपस्थितांच्या भावनांचा आदर राखून मा. शरद जोशींनी तातडीचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन जाहीर केले.

                                                                                                              गंगाधर मुटे
                                                                                                महासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश

———————————————————————————————————————
 
Pimpalgaon Basawant
* * * * * * * *
Pimpalgaon Basawant
* * * * * * * *

Pimpalgaon Basawant

* * * * * * * *
Pimpalgaon Basawant
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *

Rasta Roko

* * * * * * * *

‘ब्लॉग माझा-२०१२’ स्पर्धा – विजेता रानमोगरा

‘ब्लॉग माझा-२०१२’ स्पर्धेचा निकाल जाहीर


  ‘एबीपी माझा’ या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे जगभरातल्या मराठी भाषिक ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “ब्लॉग माझा” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत कुवैत ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर अशा विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे निकाल जाहीर करण्यांत आलेले आहेत.


          मराठी ब्लॉगर्सना व्यासपीठ मिळवून देणारी ‘ब्लॉग माझा’ ही मराठीतली एकमेव अभिनव स्पर्धा आहे. न्यू मीडियामुळे आपल्या मराठी भाषेसमोर संधी आणि आव्हानं उभी होत आहेत. या आव्हानांचं रूपांतर संधीत करण्याचा आणि या ब्लॉगसारख्या माध्यमातील मराठीला, मराठी लेखनाला व मराठी सृजनशीलतेला दाद देण्याचा उपक्रम म्हणजे ‘ब्लॉग माझा’! यंदाही या उपक्रमाला मराठी ब्लॉगर्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

        मराठी ब्लॉगच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यार्‍या ब्लॉगमधून उत्कृष्ठ आणि दर्जेदार ब्लॉग निवडीसाठी परीक्षक म्हणून असणारे दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक श्री. अशोक पानवलकर, मराठी अभ्यास केंद्राचे संचालक श्री. दीपक पवार आणि युवा नाटककार व लेखिका इरावती कर्णिक यांच्या समोर मराठी ब्लॉग्ज विश्वामधून फक्त पंधरा ब्लॉग्ज निवडण्याचं आव्हान होतं.
     या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – माझी वांङ्मयशेती” (https://gangadharmute.wordpress.com) या ब्लॉगचाही समावेश आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मराठी ब्लॉगर्सचे आणि विजेत्या ब्लॉगर्सचे मनापासून अभिनंदन! 

प्रथम पसंतीचे पाच ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग
1. सुलक्षणा लक्ष्मण-  http://mrugtrushna.blogspot.in  
2. सागर पाटील-  http://bhurata.blogspot.com
3. नरेंद्र गोळे-  http://nvgole.blogspot.in/
4. विद्या कुलकर्णी- http://asvvad.blogspot.in/
5. युवराज गुर्जर-  http://ygurjar.blogspot.in/

उत्तेजनार्थ निवडलेले दहा ब्लॉगर्स आणि त्यांचे ब्लॉग

1. अवधूत- http://ekregh.blogspot.in/
2. गंगाधर मुटे- https://gangadharmute.wordpress.com
3. प्रशांत रोटवदकर- http://athirstymanmad.blogspot.in/ 
4. तन्मय कानिटकर-  http://tanmaykanitkar.blogspot.in/
5. रोहन जगताप- http://anudini.in
6. प्रसाद इनामदार- http://prajkta-prajkta.blogspot.in
7. ब्रिजेश मराठे-  http://brijeshmarathe.wordpress.com/
8. एकनाथ मराठे- http://ejmarathe.blogspot.com
9. श्रेया महाजन- http://shreya4mahajan.blogspot.com/
10. विजय लाले- http://barmahi.blogspot.in/

(प्रथम पसंतीचे पाच ब्लॉग्ज आणि उत्तेजनार्थ दहा ब्लॉग्ज हे दोनच गट आहेत. या गटातील क्रमवारी म्हणजे गुणानुक्रम नाही.)

                       विजेते ब्लॉगर्स यांच्या कौतुक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे एपिसोड रेकॉर्डिंग मुंबई येथील ‘एबीपी माझा’ टीव्हीच्या स्टुडियो मध्ये होणार असून या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम ‘एबीपी माझा’ टीव्हीच्या खास एपिसोडमध्ये प्रसारीत केला जाणार आहे.
—————————————————————————————————————————————–
नुकताच श्री.प्रसन्न जोशी, ए.बी.पी.माझा ह्यांनी ई-मेलद्वारे वरील निकाल कळविलेला आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!


श्री.प्रसन्न जोशी आणि ए.बी.पी.माझा वाहिनी ह्यांचे हार्दिक आभार!

या विजेत्यांच्या यादीमध्ये “रानमोगरा – माझी वांङ्मयशेती” (https://gangadharmute.wordpress.com) या ब्लॉगचाही समावेश आहे.
मराठी ब्लॉगर्स आणि ब्लॉग लेखनास प्रोत्साहन देण्याचे काम ते गेल्या चार वर्षांपासून करत आहेत ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे!
सर्व परीक्षक मंडळी आणि ए.बी.पी.माझा टीव्हीच्या चमुचा मी आभारी आहे.

                                                                                                                – गंगाधर मुटे
——————————————————————————————————————————————–

‘योद्धा शेतकरी’ व ‘वांगे अमर रहे’ प्रकाशन समारंभ

‘योद्धा शेतकरी’  वांगे अमर रहे  विमोचन समारंभ

             ‘योद्धा शेतकरी’ (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित “वांगे अमर रहे” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला. संकेतस्थळाचे उद्घाटन पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक यांचे हस्ते तर “वांगे अमर रहे” पुस्तकाचे प्रकाशन शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, लोकमत, नागपूरचे संपादक मा. सुरेश व्दादशीवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.
             व्यासपिठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वभापचे अध्यक्ष, माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप, माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभापचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे, अ‍ॅड दिनेश शर्मा, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनिल घनवट, गुणवंत पाटील, राम नेवले, अंजली पातुरकर व अन्य पदाधिकारी हजर होते.

**** वर्तमानपत्रातील वृत्त ****

महाराष्ट्र टाईम्स

आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार- जोशी

म. टा. प्रतिनिधी , वर्धा
             भ्रष्टाचार हे दुधारी हत्यार आहे. एका लोकपाल विधायकाने हा भ्रष्टाचार एक टक्काही कमी होणार नाही. आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार आहे. त्यांनी सुरू केलेले लायसन्स , परमिट राज हेच याचे मूळ आहे , अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शहरातील गुजराथी भवनात रविवारी आयोजित शेतकरी संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
             यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वेदिक , सुरेश द्वादशीवार , रवी देवांग आणि संकेतस्थळाचे निर्माते गंगाधर मुटे उपस्थित होते. यावेळी वेदप्रकाश वेदिक म्हणाले , आज देशातील दहा कोटी लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविरोधात उठावाची लाट निर्माण झाली तर सत्तापरिवर्तन होऊ शकते. हे मतांनी नव्हे तर मनानी व्हायला पाहिजे. म्हणून लोकाच्या मनावर राज्य करण्याची लहर आली पाहिजे. आता ते दिवस आले आहेत. हे अलीकडील काही जनआंदोलनातून सिद्ध होते. या आंदोलनाच्या नेत्यांना मात्र राजकीय पक्ष काढून सत्तेत येण्याची घाई झालेली दिसते. नेमकी येथेच ही आंदोलने फसतात. जोशींनीही हा अनुभव घेतला आहे , असेही वेदिक म्हणाले. सुरेश द्वादशीवार म्हणाले , आंदोलनांना विचारांची शक्ती असेल तरच ती उभी होतात. पुढे जातात नाहीतर सोमवारी सुरू झालेले आंदोलन शुक्रवारी दिसत नाही. शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाला प्रचंड वैचारिक बळ असल्यानेच ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले.
             शेतकरी संघटनेची http://www.sharadjoshi.in अर्थात ‘ योद्धा शेतकरी ‘ या वेबसाईटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. याप्रसंगी कवी व वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या ‘ वांगे अमर रहे ‘ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले.
*

लोकमत

शेतीवर पोट असणार्‍यांनाच शेतकर्‍यांच्या वेदना कळतात – शरद जोशी

वर्धा। दि. २२ (शहर प्रतिनिधी)
                 भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. मात्र याच देशातील शेतकर्‍यांची दैनावस्था आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट शेती व्यवसायावर असेल त्यांनाच शेतकर्‍यांच्या खर्‍या वेदना कळतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
स्थानिक गुजराती भवन येथे शेतकरी संघटनेच्या वतीने योद्धा शेतकरी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
                    या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पि.टी.आय.चे माजी अध्यक्ष वेदप्रताप वैदीक तर अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार उपस्थित होते. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, स्वतंत्र भारत पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे आदी मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून या उद्घाटन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित वांगे अमर रहे या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
           सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. द्वादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरूण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्‍यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्विकारावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला संघटनेचे कार्यकर्ते नव्या जोमाने शेतकर्‍यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. पटर्वधन यांच्या बासरी वादनातून वैष्णव जन तो या गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
*

सकाळ

शेतकर्‍यांसाठी शरद जोशींनी उभारलेला लढा महत्त्वाचा

पत्रकार वैदिक : ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
वर्धा,ता २२:                    
              शेतकर्‍यांकरिता शरद जोशींनी उभा केलेला लढा महत्त्वाचा आहे. त्यांचे मौलिक विचार येणार्‍या काळातही दिशादर्शक ठरतील, असा विश्वास जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक (दिल्ली) यांनी श्री. जोशी यांच्या समग्र जीवनकार्य़ावरील ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाच्‍या येथील उद्घाटन कार्य़क्रमात व्यक्त केला.                    

              येथील गुजरात भवनाच्या सभागृहात आज उद्घाटन समारंभ पार पडला. कार्य़क्रमाला शेतकरी संघट्नेचे सर्वेसर्वा शरद जोशी, जेष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, स्वभापच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महीला आघाडीच्य़ा अध्यक्ष शैलजा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संकेतस्थळावर शेतकरी सघंटनेची विविध आंदोलने, छायाचित्र, त्यावरील वृत्तांत, शरद जोशींनी लिहीलेली १७ मराठी, तीन इंग्रजी आणि दोन हिंदी पुस्तके, राज्यसभेतील त्यांची भाषणे, जीवन परिचय आदींचा समावेश आहे

.                      यावेळी संघटनेचे पदाधिकारी गंगाधर मुटे यांच्या “वांगे अमर रहे” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात श्री. मुटे यांनी मागील दोन वर्षात लिहिलेल्या वैचारिक लेख, कथा, ललीत लेखनाचे संकलन आहे.                     

                      पुढे बोलताना श्री. वैदीक म्हणाले, ’योद्धा शेतकरी’ हे संकेतस्थळ आपण इंग्रजी आणि हिंदी मध्ये सुरू केले. त्यांचा क्रम आधी मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असायला हवा होता. सध्या देशात भ्रष्टाचाराच्या काहूर माजले आहे. भ्रष्टाचारावर लगाम लावण्याकरिता कठोर पावले उचलण्यात आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.                    
                      यावेळी विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. शैलजा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

*

लोकशाही वार्ता

शेतीवर पोट असलेले नेतेच शेतकर्‍यांसाठी लढतात

प्रतिनिधी/ २२ जुलै
                   वर्धा : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते मात्र याच देशातील शेतकर्‍याची दैनावस्था आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट हे शेती व्यवसायावर भरत असेल त्यांनाच शेतकर्‍यांच्या खर्‍या वेदना कळतात, समस्येची जाणीव असते आणि तेच शेतकर्‍यांच्या न्यायासाठी पोटतिडकीने भाग घेऊन लढतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
              स्थानिक गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या पुढाकाराने ‘योद्धा शेतकरी’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार पी.टी. आय चे माजी अध्यक्ष वेदप्रतापजी वैदिक तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश व्दादशीवार उपस्थित होते.
              शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, महिला आघाडी स्वभाप अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदण हरणे यांची उपस्थिती होती. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून फळाला गेलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित ‘वांगे अमर रहे’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. उद््घाटनीय भाषणातून महाराष्ट्राच्या भूमीत शरद जोशीसारखे शेतकरी नेते निर्माण होणे म्हणजे अहोभाग्य असल्याचे वैदिक यांनी सांगितले. तर प्रणेते शरद जोशी यांनी या संकेतस्थळाची कल्पना पूर्वीपासूनच मनात होती परंतु काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच शेतकरी संघटनेला व नेत्यांना इतर नेत्यांप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले नाही. ही संकेतस्थळाची इच्छा मुटे यांनी पूर्णत्वास नेल्याने शेतकरी संघटनेला नवी भरारी मिळाली आहे. यामुळे त्यांनी मुटे यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक सुरेश व्दादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरुण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्‍यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असे सांगितले. तसेच या संकेतस्थळाने शेतकरी संघटना व तिचे कार्य हे सर्वदुर पसरणार असल्याने सध्या आलेली मरगळ झटकुन शेतकरी संघटनेने पुन्हा नव्याने उभारी घेण्याची गरज व्यक्त केली. शरीराने थकलेल्या पण मनाने आणि विचाराने तरूण असलेल्या नेत्याला आराम देऊन केवळ त्यांच्या मार्गावर कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला हजारोंच्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी छातीवर संघटनेचा लाल बिल्ला लाऊन पुन्हा नव्या जोमाने शेतकर्‍यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित झाले होते. पटवर्धन यांच्या बासरी वादनातून ‘वैष्णव जन तो तेने कहीए जे पीर परायी जाने रे’ या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*

लोकशाही वार्ता

लोकपाल विधेयकांने काय साध्य होणार?

जिल्हा प्रतिनिधी/ २२ जुलै
              वर्धा : पं. नेहरु प्रणित समाजवादाच्या नावाखाली या देशामध्ये परमीट राज्य आणले.यातूनच मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. याला आळा घालण्यासाठी कायदा करणे महत्वाचे नाही. इतकेच नव्हे तर सध्या गाजत असलेल्या लोकपाल विधेकातूनही हा भ्रष्टाचार संपुष्टात येणार नाही. मग असे विधेयक तयार करून काय साध्य होणार असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी उपस्थित केला. आज वर्धा शहरातील गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वेबसाईटचे उद््घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
              यावेळी उद्घाटक म्हणून दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वेदीक, अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश द्वादशीवार तर प्रमुख पाहूणे म्हणून अँड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे, मधुसुधन हरणे, अँड. दिनेश शर्मा, रवी देवांग, अंजना पातुकर व अन्य मान्यवर उपस्थितीत होते. शरद जोशी पुढे म्हणाले, गोखले, न्या. रानडे, टिळक यांच्या काळातील आदर्श आता अस्ताला जात आहे. नेहरुवादी समाजवादाने भ्रष्टाचाराला जन्म दिला. त्याला कायमचा निपटून काढायचा असेल तर राजकीय व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे.
              शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांचे प्रश्न अतिशय गांभिर्याने राज्यकर्त्यांकडे मांडले. हा संपूर्ण इतिहास वेबसाईटच्या माध्यमातून आता जगापर्यंत पोहचणार आहे. ही वेबसाईट शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तयार केली. यामध्ये संघटनेच्या निर्मितीपासूनचा इतिहास व महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. जेष्ठ पत्रकार वेदीक म्हणाले, राज्यसत्तेने यथा स्थितीवादाला आधार बनवू नये. जनआंदोलनामुळे संपूर्ण जगात राजकीय सत्तेत बदल होत आहे. या आंदोलनांना समाज परिवर्तनाचे आधार असले पाहिजे. राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था आपण अजूनही तयार करू शक लो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नवे तंत्रज्ञान शेतीला मारक ठरवू नये असेही ते म्हणाले. प्रा. द्वादशीवार यांनी शरद जोशी यांच्या कार्याचा आढावा घेवून ही संघटना बळकट करण्यासाठी नव्या भूमिका जोशी यांच्या नेतृत्वात अजूनही कायम असल्याचे आवर्जुन नमुद केले. यावेळी गंगाधर मुटे यांनी लिहिलेल्या ‘वांगे अमर रहे’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे.
*

Sharad Joshi

Farmer

Web Site
———————————————————————-
कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
———————————————————————-
शेतकरी
———————————————————————————-
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
———————————————————————————-
शेतकरी संघटना
————————————————————————————–
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते गोविंद जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले..
————————————————————————————–
कृषी
————————————————————————————–
माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर यांनी प्रस्ताविक केले.
————————————————————————————–
शरद जोशी
————————————————————————————–
माजी आमदार आणि स्वभापचे अध्यक्ष अ‍ॅड वामनराव चटप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
————————————————————————————–
संकेतस्थळ
———————————————————————-
अ‍ॅड दिनेश शर्मा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
———————————————————————-
Dinesh Sharma
———————————————————————-
मा. वेदप्रताप वैदीक यांनी संकेतस्थळाचे औपचारिक विमोचन केले.
———————————————————————-
Shetkari Sanghatana
———————————————————————-
कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
———————————————————————-
Wardha
———————————————————————-
मा. वेदप्रताप वैदीक यांनी संकेतस्थळाचे औपचारिक विमोचन केले.
———————————————————————-
Kisan
———————————————————————-
संकेतस्थळाचे अवलोकन करताना मान्यवर.
———————————————————————-
Wange Amar Rahe
———————————————————————-
कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
———————————————————————-
Shetkari
———————————————————————-
संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
———————————————————————-
Gangadhar Mute
———————————————————————-
संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
———————————————————————-
वेदप्रतापजी वैदीक
———————————————————————-
उद्घाटनपर भाषण करतांना पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक.
———————————————————————-
गंगाधर मुटे
———————————————————————-
संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
———————————————————————-
Sharad Joshi
—————————————————————————————
गंगाधर मुटे लिखित “वांगे अमर रहे” पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.
—————————————————————————————
 शरद जोशी
—————————————————————————————
गंगाधर मुटे लिखित “वांगे अमर रहे” पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.
—————————————————————————————
वांगे अमर रहे
—————————————————————————————
गंगाधर मुटे लिखित “वांगे अमर रहे” पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.
—————————————————————————————
शरद जोशी
—————————————————————————————
शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी मार्गदर्शन करतांना.
—————————————————————————————
संकेतस्थळ
—————————————————————————————
प्रा. पांडुरंग भालशंकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
—————————————————————————————
सुरेशजी व्दादशीवार
—————————————————————————————
मा. सुरेशजी व्दादशीवार अध्यक्षीय भाषण करतांना.
—————————————————————————————
Womens
—————————————————————————————
कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
—————————————————————————————
Ravi Dewang
—————————————————————————————
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग यांनी संकेतस्थळाच्या निर्मितीबद्दल गंगाधर मुटे यांचे पुष्पहाराने विशेष अभिनंदन केले.
—————————————————————————————
रवी देवांग
—————————————————————————————
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग मार्गदर्शन करताना.
—————————————————————————————
शैलजा देशपांडे
—————————————————————————————
शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
—————————————————————————————
Deshonnati
—————————————————————————————
Agrowon
—————————————————————————————
Wange amar rahe
—————————————————————————————

———————————————————————————————————

वांगे अमर रहे PDF फ़ाईल स्वरुपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
———————————————————————————————————

आकाशवाणीवर मराठी गझल मुशायरा

आकाशवाणीवर मराठी गझल मुशायरा

दि. ०३ जुन २०१२ ला यवतमाळ आकाशवाणी वरून (१०२.७) रात्री ९.३० वाजता मराठी गझल मुशायर्‍याचे प्रसारण करण्यात आले.

या मुशायर्‍यात सिद्धार्थ भगत, ललित सोनवणे, मसूद पटेल, प्रा. रुपेश देशमुख, गंगाधर मुटे, पवन नालट, प्रमोद चोबितकर. विनय मिरासे, उज्वल सरदार यांचेसह अनेक गझकारांचा सहभाग होता.

यवतमाळ आकाशवाणी प्रसारणाचा संपादीत भाग येथे ऐकता येईल.

केंद्रसरकारचे दहन

शेतकरी संघटनेने केले

केंद्रसरकारचे दहन


              केंद्रसरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकर्‍यांभिमुख असावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने वारंवार लावून धरलेली आहे, जेणेकरून खुल्या अर्थव्यवस्थेचा फ़ायदा शेतकर्‍यांनाही मिळू शकेल. परंतु शेतमालाला बरे भाव मिळण्याची चिन्हे दिसत असतानाच वारंवार केंद्रशासनाचा शेतकरी द्वेष जागा होतो. 

              यावर्षी आधीच कापसाचे भाव कमी असतानासुद्धा काही राज्यातील मतदान संपल्याबरोबर केंद्रसरकारच्या वाणिज्य व वस्त्रोद्योग मंत्रालयाने अचानक “दरवर्षीप्रमाणे यंदाही” निर्यात बंदीची घोषणा केली आणि देशांतर्गत कापसाचे भाव पाडण्याचा कट रचला. त्यामुळे त्याचा परिणाम कापूस बाजारावर होऊन कापसाचे भाव गडगडले आणि व्यापार्‍यांनी कापसाची खरेदीही थांबवली.

              आधीच कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला असतांना आणि कापूस उत्पादक प्रदेशात शेतकरी आत्महत्त्यांनी थैमान घातलेले असताना केवळ गिरणीमालकांना कापूस स्वस्तात मिळावा, या एकमेव उद्देशाने केंद्रसरकारने गिरणीमालकांच्या सोईचा निर्णय घेऊन शेतकर्‍यांचा पुन्हा एकदा विश्वासघात केलेला आहे.

              या कापसाच्या निर्णय बंदीचा निषेध करण्यासाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतिने दि. ७ मार्च रोजी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, महात्मा गांधी पुतळ्यासमोर “केंद्रसरकारचा प्रतिकात्मक पुतळा” जाळून होळीचा सण साजरा केला आणि निषेध नोंदविला. आंदोलनाचे नेतृत्त्व माजी आमदार सरोज काशीकर, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, मधुसुदन हरणे यांनी केले. 

              शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी न करता तातडीने कापूस निर्यात बंदी उठवावी आणि कापसाच्या अधिक गाठीच्या निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यामार्फ़त केंद्र सरकारला सादर केले.

              शिष्टमंडळात माजी आमदार सरोज काशीकर, शैलजा देशपांडे, गंगाधर मुटे, मधुसुदन हरणे, सचिन डाफ़े, संध्या राऊत, सुनंदा तुपकर, सतिश दाणी, सुभाष बोकडे, निळकंठ घवघवे, प्रभाकर झाडे आदींचा समावेश होता.
*  *  *  *
*  *  *  *
*  *  *  *
———————————————————————————————————–

स्टार माझा बातमी

धुंद रवी यांचेवर प्राणघातक हल्ला

मित्र-मैत्रिणींनो,

एक वाईट बातमी आहे. आंतरजालावरील लोकप्रिय लेखक धुंद रवी आणि त्यांचे कुटुंबियांवर महिन्यापुर्वी प्राणघातक हल्ला झाला. ही बातमी आज मला कळली. धुंद रवी आणि त्यांचे आई-वडील आणि बहिण यांच्यावर कोयत्याने वार झाले आणि झालेल्या जखमा खुप गंभीर स्वरुपाच्या होत्या.

पण दिलासा देणारी बाब एवढीच की ते मृत्युशी झुंज देऊन आता सावरताहेत.

आयुष्य पुर्णपणे सुरळीत व्हायला बराच काळ जाईल.

परमेश्वर त्यांना लवकरात लवकर संपूर्ण स्वास्थ प्रदान करो, ही सदिच्छा.

बातमी इथे जोडलीये.Dhund Ravi

कापूस व धान उत्पादक परिषद – सचित्र वृत्तांत

कापूस परिषद
* * * * * * * * *


विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषद – सचित्र वृत्तांत

सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०११ 
 – गोकुलधाम मैदान * 
– दुपारी १२ वाजता, 
– हिंगणघाट (जि. वर्धा) 
 * * * * * * * * *
शेतकरी 
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 * * * * * * * * *
हिंगणघाट 
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 * * * * * * * * *
लोकमत 
लोकमत बातमी ०८ नोव्हे २०११ 
* * * * * * * * *
kisan 
मा. शरद जोशी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून परिषदेची सुरूवात करण्यात आली. 
* * * * * * * * *
baliraja 
परिषदेला दहा हजारावर शेतकरी उपस्थित होते. 
* * * * * * * * *
cotton
व्यासपिठावर डावीकडून शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. शैलजा देशपांडे, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रांताध्यक्षा माजी आमदार सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते, दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग, माजी अध्यक्ष राम नेवले. 
 * * * * * * * * *
देशोन्नती

देशोन्नती बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
shetkari
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक भाषण आणि परिषदेचे संचालन केले.
* * * * * * * * *
agri
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप
* * * * * * * * *
हितवाद
हितवाद बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
कापूस
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग
* * * * * * * * *
धान
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
तरुण भारत
तरुण भारत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
कापूस व धान उत्पादक परिषद
शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी
* * * * * * * * *
बळीराजा

दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
सकाळ
सकाळ बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शरद जोशी
दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक मा. शरद जोशी
* * * * * * * * *
शेतकरी संघटना
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
लोकसत्ता
लोकसत्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
गंगाधर मुटे
शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते मा. शरद जोशी
* * * * * * * * *
हिंगणघाट
शेतकर्‍याला सुखाने व सन्मानाने जगता यासाठी प्रयत्न करण्याची सर्वांनी शपथ घेतली.
* * * * * * * * *
किसान संघटन
उपस्थित जनसमुदाय.
* * * * * * * * *
लोकशाही वार्ता
लोकशाही वार्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको

सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
                    मुंबईतील ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्थेच्या या वर्षीच्या सामाजिक क्षेत्रासाठी असलेल्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी, निवड समितीने शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांची निवडक केली आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्‍यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, त्या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानच्या यंदाच्या सामाजिक ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी श्री. शरद जोशींची निवड करीत असल्याचे निवड समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

                   शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार या निवडीमागे असल्याचे समितीने म्हटले आहे.

                        डॉ. अरुण टीकेकर अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले.

                         मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरकार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला आहे.

                       हा पुरस्कार स्वीकारण्यास श्री. शरद जोशी यांनीही सानंद संमती दिली असून डिसेंबर २०११ मध्ये मुंबईत होणार्‍या चतुरंग रंगसंमेलनात श्री. शरद जोशी यांना तो प्रदान करण्यात येईल.

——————————————————————————————————

स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo





स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo

स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.

———————————————————————–

———————————————————————–
अन्य व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

———————————————————————–

………………………………………………………………………………….

गझलोत्सव – २०११

गझलोत्सव- २०११
अमरावती येथील संत ज्ञानेश्वर संकुलात दिन. ०९-०१-२०११ रोज रविवारला बांधण जनप्रतिष्ठान आणि सुरेश भट स्मृती प्रतिष्ठान यांचे सयुंक्त विद्यमाने ४ था गझलोत्सव – २०११ संपन्न झाला.
त्याप्रसंगाची काही क्षणचित्रे.
……………………………………..

Gazal

दीप प्रज्वलीत करताना मा. सुशीलकुमार शिंदे


……………………………………..
Gazal

संगीतकार मा.कौशल इनामदार भाषण करताना.


……………………………………..
Gazal

चित्रपट दिग्दर्शक मा. राजदत्त भाषण करताना.


……………………………………..
Gajhal

प्रसिद्ध जेष्ठ गझलकार मा. म.भा.चव्हान भाषण करताना.


…………………………………….
गझल

मा. सुशीलकुमार शिंदे यांचे हस्ते जेष्ठ गझलकार मा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना मा. डॉ. श्रीकृष्ण राऊत


……………………………………