कापसाचा उत्पादन खर्च.


कापसाची दशा, दिशा आणि दुर्दशा


            
यंदा पुन्हा एकदा कापसाच्या भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि या निमित्ताने कापसाच्या उत्पादन खर्चाचा प्रश्न चव्हाट्यावर मांडला जात आहे. शेतमालास उत्पादन खर्चानुसार रास्त भाव मिळावेत, ही शेतकरी संघटनेची प्रारंभापासूनची भुमिका राहिली आहे. शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी विदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारचा कृषि मुल्य आयोग चुकीच्या उत्पादन खर्च काढण्याच्या पद्धती वापरून व त्या आधारे शेतमालाच्या किंमती कमी ठेऊन भारतीय शेतकर्‍यांचे कसे शोषण करतो, हे  पहिल्यांदाच शास्त्रशुद्ध पद्धतीने भारतीय शेतकर्‍यांना शिकविले.

            सरकार हे शेतकर्‍यांचे मायबाप असते मात्र शेतमालाला कमी भाव मिळण्याचे कारण व्यापारी असून व्यापारीच शेतकर्‍यांना लुबाडतात, असाच सार्वत्रीक समज शरद जोशी भारतात येईपर्यंत तरी प्रचलित होता. शरद जोशींनी या प्रचलित गृहितकालाच कलाटनी देऊन शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण असते, शेतमालालाला त्याचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही एवढे कमी भाव देण्यासाठी सरकार नानाविध क्लुप्त्या वापरून शेतमालाचे भाव नियंत्रित करत असते, असे ठामपणे मांडले.

            तीस वर्षाच्या शेतकरी संघटनेच्या इतिहासाकडे मागे वळून पाहताना एक बाब अगदी स्पष्टपणे जाणवते की, शेतीच्या दुर्दशेला केवळ सरकार आणि सरकारची शेतीविरोधी धोरणेच कारणीभूत आहे, या शेतकरी संघटनेच्या विचाराला आता जनमान्यता मिळाली आहे. शेती विषयात वैचारिक क्रांती घडवून आणण्यात शेतकरी संघटनेला निर्भेळ यश प्राप्त झाले आहे.

कापसाचे उत्पादन मुल्य काढण्याची सदोष शासकीय पद्धत
 :

            खरीप २०१०-११ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषि मुल्य निर्धारण समितीने कापसाचा उत्पादन खर्च जाहीर केला (तक्ता क्र.१) त्यात अनेक दोष आहेत. पुरुष शेतमजुरीचा दर ९२/- रुपये तर महिला शेतमजुरीचा दर ५६/- रू. हिशेबात धरला आहे. वास्तविकता शेतमजुरीचा दर निश्चित करताना पुरुष आणि महिला असा भेदभाव करण्याचे काहीच कारण नाही. शासकीय कर्मचार्‍याचे वेतन पुरुषांना वेगळे आणि महिलांना वेगळे देण्याची खुद्द शासनाची पद्धत नाही. 
केंद्र सरकारच्या १९४८ च्या किमान वेतन कायद्यानुसारकिमान वेतन दरामधील दुरुस्ती १ऑक्टोबर २०१० रोजी करण्यात आलीराज्य सरकारी पातळीवर ह्यामधील दुरुस्त्या वेळोवेळी झाल्या आहेतअधिसूचित रोजगारांसाठी ठरवून दिलेले किमान वेतनाचे दरशेतीक्षेत्रासहितसर्व संघटित तसेच असंघटित उद्योगांना लागू आहेतकेंद्र आणि राज्य सरकारी पातळीवरील सर्व अधिसूचित रोजगारांमधील अकुशल कामगारांसाठीच्या किमान वेतनाची तसेच शेतीक्षेत्रातील अधिसूचित रोजगारांमधील अकुशल कामगारांसाठीचे किमान वेतनाचे दर केंद्रपातळीवर रु. १६३/- आणि महाराष्ट्र राज्य पातळीवर रु. १२०/- असताना आणि त्यात महिला व पुरुष असा भेदभाव केला नसताना कृषि मुल्य निर्धारण समितीने कापसाचा उत्पादन खर्च काढताना किमान वेतन कायद्याने ठरवून दिलेल्या वेतनापेक्षा कमी धरणे हा कायदेशीर गुन्हाच ठरायला हवा.
तक्ता क्रं.
Apendix – L (I)
Per hectare item-wise cost of cultovation of kharif crop “Cotton (Long staple)” in Maharashtra for 2010-11 Marketing Season
Sr.
No.
Items
Units
Inputs
per
hectare
Cost per
unit of
inputs (Rs)
Total cost
per
hectare (Rs.)
1
2
3
4
5
6
1
Hired Human Labour                  Male
Days
  19.47
  92.00
 1,791.24
Female
Days
 92.71
 56.00
5,191.76
2
Bullock Labour
Pair Days
 19.62
 295.00
5,787.90
3
Machinery Charges
Rs
-  
            -  
 1,007.55
4
Seed
Kg
 1.62
1,518.00
2,459.16
5
Manure
Cartload
6.15
256.00
1,574.40
6
Fertilizers (In terms of nutrients)                            N
Kg
61.12
10.50
641.76
P
Kg
43.00
21.63
930.09
K
Kg
19.95
7.43
  148.23
Sub Total 6
Rs
1,720.08
1,720.08
7
Irrigation Charges
Rs
243.47
8
Insecticides
Rs
1,155.43
9
Insurance Charges
Rs
1,239.04
10
Incidental Charges
Rs
 242.55
Working Capital  (Item 1 to 10)
Rs
22,412.58
11
Interest on working capital
Rs
672.38
12
Land revenue, cess,& taxes
Rs
39.69
13
Depreciation on implements & farm buildings
Rs
441.73
Cost A1
Rs
23,566.38
Cost A2 (A1+rent paid for leased in land)
Rs
3,249.27
              -  
Cost A2F1 (A2+Family Labour)
Rs
26,815.65
14
Interest on Fixed capital
Rs
 770.24
Cost B1(A1+Interest on fixed capital)
Rs
24,336.62
15
Rental Value of Land
Rs
6,215.31
Cost B2(B1+Rental Value of Land+
rent paid for leased in land)
Rs
30,551.93
16
Family Human Labour                                        Male
Days
23.12
 92.00
2,127.04
Female
Days
20.04
 56.00
1,122.24
Cost ”C1″ (B1+Family labour)
Rs
27,585.90
Cost ”C2″ (B2+Family labour)
Rs
33,801.21
17
yield per hectare
Qtls
12.51
18
Per Quintal cost C2
Rs/Qtls
2,701.93
Per Quintal Marketing Charges
Rs/Qtls
 133.50
Per Quintal Transport Charges
Rs/Qtls
45.00
Cost C2 (Per Quintal)
Rs/Qtls
2,880.43
19
Cost C3 (C2+10% of C2)*
Rs/Qtls
3,168.48
20
Value Of main produce per hectare
Rs
39,637.66
21
Value Of bi-produce per hectare
Rs
              -  
22
Per Quintal cost of cultivation
Rs
3,168.48
* It is sugested that following additional amt (per Qtls cost) be consider other than price quoted
above for the benefit of farmer iterest on working capital (half yearely)
         53.79
53.75
15% Profit on cost of cultivation
       475.27
Per quintal praposed cost of cultivation
   3,697.54
Note : Transport Charges & Marketing Charges are included in cost C2 as recommonded by Alagh Committee.
            तक्ता क्रं – १ वरून वरवर नजर फ़िरविली तरी शासकीय उत्पादन खर्च काढतांना झालेल्या किंवा जाणूनबुजून केलेल्या चुका व तृटी सहजपणे लक्षात येईल. शेतमालाचा उत्पादनखर्च काढताना सदोष कार्यपद्धती आणि चुकीची आकडेवारी वापरून सरकार दुहेरी बदमाशी करत असल्याचे ठळकपणे जाणवायला लागते. कृषि मुल्य आयोग किंवा कृषि मुल्य निर्धारण समिती ज्या सदोष पद्धतीने कापसाचा उत्पादन खर्च काढतेत्याच तक्त्यात जर वस्तुनिष्ठ आकडे घातले तरी कापसाचा उत्पादन खर्च ७९६६/- रु. प्रति क्विंटल एवढा निघतो. (तक्ता क्रं.२)
तक्ता क्रं.२
Per Hectare cost of cultovation of kharif crop “Cotton” in Maharashtra for 2011-12 Marketing Season



Sr.
Items
Units
Inputs
per
hectare
Cost per
unit of
inputs (Rs)
Total cost
per
hectare (Rs.)
1
2
3
4
5
6
1
Hired Human
Labour          Male
Days
 19.47
 200.00
3,894.00
                                              Female
Days
 92.71
200.00
18,542.00
2
Bullock Labour
Pair Days
 19.62
 600.00
11,772.00
3
Machinery Charges
Rs
       -  
            -  
2,500.00
4
Seed
Kg
   1.62
1,518.00
2,459.16
5
Manure
Cartload
      10
 400.00
 4,000.00
6
Fertilizers (In terms
of nutrients)    DAP
 50 Kg/Bag
        3
 956.00
 2,868
                                              Urea
 50 Kg/Bag
        3
  281.00
    843
                                             
Potash
50 Kg/Bag
        1
  595.00
    595
Sub Total 6
 Rs
 4,306
4,306.00
7
Irrigation Charges
Rs
              -  
8
Insecticides
Rs
1,155.43
9
Insurance Charges
Rs
              -  
10
Incidental Charges
Rs
5,000.00
Working Capital  (Item 1 to 10)
Rs
53,634.59
11
Interest on working
capital
Rs
  2,896.27
12
Land revenue,
cess,& taxes
Rs
       39.69
13
Depreciation on
implements &
 farm buildings
Rs
   4,000.00
Cost A1
Rs
60,570.55
Cost A2 (A1+rent paid
for leased in land)
Rs
 3,249
              -  
Cost A2F1 (A2+Family
Labour)
Rs
63,819.82
14
Interest on Fixed
capital
Rs
     770.24
Cost B1(A1+Interest on
fixed capital)
Rs
61,340.79
15
Rental Value of Land
Rs
              -  
Cost B2(B1+Rental
Value of Land+
rent paid for leased in land)
Rs
61,340.79
16
Family Human
Labour                     Male
Days
 23.12
  200.00
4,624.00
                                                        Female
Days
 20.04
200.00
4,008.00
Cost ”C1″
(B1+Family labour)
Rs
69,972.79
Cost ”C2″
(B2+Family labour)
Rs
69,972.79
17
yield per hectare
Qtls
 12.00
18
Per Quintal cost C2
Rs/Qtls
 5,831.07
Per Quintal Marketing
Charges
Rs/Qtls
 133.50
Per Quintal Transport
Charges
Rs/Qtls
 150.00
Cost C2 (Per Quintal)
Rs/Qtls
 6,114.57
19
Cost C3 (C2+10% of
C2)*
Rs/Qtls
  6,726.02
20
Value Of main produce
per hectare
Rs
80,712.27
21
Value Of bi-produce
per hectare
Rs
              -  
22
Per Quintal cost of
cultivation
Rs
6,726.02


* It is sugested that following additional amt (per Qtls cost) be consider other than price quoted
above for the benefit of farmer iterest on working capital (half yearely)
              231.70
15% Profit on cost of cultivation
           1,008.90

Per quintal minimum cost of cultivation
7,966.63

Note :Marketing Charges are included in cost C2 as recommonded by Alagh Committee &
 Transport Charges as per market freight rates.
            तक्ता क्रमांक २ मध्ये कापसाचा उत्पादनखर्च प्रति क्विंटल ७९६६/- रुपये निघत असला तरी या उत्पादन खर्चाला शास्त्रशुद्ध उत्पादनखर्च म्हणता येणार नाही कारण यामध्ये अनेक लागवडी व अन्य खर्च सामाविष्ठ झालेले नाहीत. उदा. हिशेबामध्ये शेतीला ६ टक्के व्याजदराने वित्तपुरवठा केला जातो असे गृहित धरून सहामहिने खेळते भांडवल या तर्‍हेने ३ टक्के व्याज धरले गेले आहे. परंतु बॅंका शेतकर्‍याच्या घरात नसतात, तालुक्याच्या ठिकाणी असतात. बॅंकेपर्यंत जायला प्रवासखर्च येतो, नोड्यू काढायला अवांतर बँकाकडे रितसर पैसे भरायला लागतात. शेतगहाण करायला स्टँम्पड्युटी लागते, अन्य कागदपत्रे गोळा करायला खर्च येतो याकडे साफ़ दुर्लक्ष केले गेले आहे.
शास्त्रशुद्ध उत्पादन खर्च कसा असेल?
कापसाचा उत्पादन खर्च.  
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकर कापूस पिकाचा खालील प्रमाणे:
अ] भांडवली खर्च :
१) शेती औजारे-खरेदी/दुरुस्ती :                           २०,०००.००
२) बैल जोडी :                                                    ८०,०००.००
३) बैलांसाठी गोठा :                                        ,००,०००.००
४) साठवणूक शेड :                                          ,००,०००.००
————————————————-———-—————-
अ] एकूण भांडवली खर्च :                                   ,००,०००.००    
———————————————-————–—————
ब] चालू खर्च (खेळता भांडवली खर्च)
१) शेण खत :                                                   १,२०,००० रु
२) नांगरट करणे :                                                 ८,००० रु
३) ढेकळे फ़ोडणेसपाटीकरण :                             ४,००० रु.
४) काडीकचरा वेचणे :                                           ८,००० रु.
५) बियाणे :                                                        १८,६०० रु.
६) लागवड खर्च :                                                  ८,००० रु.
७) खांडण्या भरणे :                                               २,००० रु.
८) निंदणी/खुरपणी खर्च (दोन वेळा) :                   १५,००० रु.
९) रासायणीक खत मात्रा                                    २४,००० रु.
१०) रासायणीक खत मात्रा-मजूरी खर्च :                ८,००० रु.
११) सुक्ष्म अन्नद्रव्य :                                          ७,००० रु.
१२) किटकनाशके :                                             ३०,००० रु.
१३) फ़वारणी मजूरी :                                           ६,००० रु.
१४) कापूस वेचणी (६० क्विंटल) :                        ५२,००० रु.
१५) वाहतूक/विक्री खर्च :                                       ५,००० रु.
१६) बैलाची ढेप/पेंड :                                             ३,००० रु.
१७) बांधबंदिस्ती/सपाटीकरण खर्च :                    २०,००० रु.
————————————————————————–
ब] एकूण खेळते भांडवली खर्च  :                      ३,३८,६००.००
————————————————————————–
.
१) भांडवली खर्चावरील व्याज :                       ३२,०००.००
२) चालु गुंतवणुकीवरील व्याज :                      ३०,०००.००
३) भांडवली साहित्यावरील घसारा :                ३२,०००.००
—————————————————————————
क] एकूण खर्च १+२+३      :                         ९४,०००.००
—————————————————————————
अ] खेळत्या भांडवली खर्चावरील व्याज :                             ६६,०००.००
ब] एकूण खेळते भांडवली खर्च  :                                    ३,३८,६००.००
क] एकूण उत्पादन खर्च १+२+३                                        ९४,०००.००
———————————————————————————————-
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क   :                                    ४,९८,६००.००   
———————————————————————————————-
निष्कर्ष :
१) १० एकरात ६० क्विंटल कापूस पिकविण्याचा खर्च :             ४,९८,६००.०० 
२) १  एकरात ६  क्विंटल कापूस पिकविण्याचा खर्च :                  ४९,८६०.००
                                             म्हणजेच
प्रती क्विंटल कापसाचा किमान उत्पादनखर्च  :  ८३१०.०० रु.   एवढा निघतो.
टीप :
१) दर चार वर्षांतून एकदा शेतीमध्ये ओला किंवा कोरडा दुष्काळ हमखास पडतच असतो. त्यामुळे उत्पादन खर्च काढताना चार वर्षाच्या लागवडीचा खर्च तीन वर्षाच्या उत्पादनावर/पीकावर लावणे गरजेचे आहे.  अशा तर्‍हेचा निकष औद्योगीक उत्पादनाचे मुल्य ठरविताना लावले जातच असते. त्या हिशेबाने प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च १०,४००/- रुपयावर जातो.    
२) लागवडी खर्चामध्ये किरकोळ खर्चबैलांचा चाराबैलांचा इंन्शुरन्स धरला तर प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च ११,५००/- रुपयावर जातो.    
३) दुष्काळामुळेमहापुरामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी तसेच माकडडुक्कर व वन्य श्वापदापासून होणारे नुकसान हिशेबात धरल्यास प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च १३०००/- रुपयावर जातो.    
   
              वरिलप्रमाणे मी काढलेला कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यासतृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.    
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.    
१) १ शेतकरी व १ बैलजोडी १० एकर कापसाची शेती करु शकतोअसे गृहित धरले आहे.    
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.    
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.    
४) शेण खतनांगरटबियाणेरासायनीक खतेकिटकनाशकेसुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षाही कमी खर्च हिशेबात धरला आहे.    
५) शेतमजुरीचा दर २००/- रू. धरलेला आहे.      
६) कपाशीच्या दुबारपेरणीचे संकट निर्माण झाल्यास त्यापोटी वाढणारा बियाणाचा खर्च हिशेबात धरलेला नाही. ७) शेत जमीनीची किंमत आणि त्या भांडवली गुंतवणुकीवरील व्याज हिशेबात धरलेले नाही. त्यामुळे वडिलोपार्जीत शेतजमीन ज्यांच्याकडे नाहीत्यांनी शेतजमीन खरेदी करून कापसाची शेती करायची म्हटले तर उत्पादन खर्च आणखी वाढेल. 
८) वरील उत्पादनखर्चात काटकसर आणि बचत करायचा प्रयत्न केल्यास उत्पादन घटत जाते. तसेच खर्च वाढवायचा प्रयत्न केल्यास उत्पादनात वाढ होण्याची शक्यता बळावत जाते.
९) शेतीमधील खेळत्या भांडवल तुटवड्याचा पहिला मार जमीनीच्या पोत सुधारणीच्या कामावर पडतो. उदा. शेणखताचा खर्च हिशेबात १,२०,०००/- धरला आहे. जमिनीचा पोत कायम राहण्यासाठी एकरी १० गाड्या शेणखत घालणे गरजेचे आहे पण आर्थिक टंचाईमुळे शेणखत किंवा सेंद्रियखताचा वापर टाळला किंवा कमी केला जातो. त्यामुळे जमीनीचा पोत घसरतो. कालांतराने जमीन नापिक होऊन अपेक्षित उत्पन्न येत नाही. शेणखत किंवा सेंद्रीय खतावरील खर्च टाळल्याने लागवडीचा खर्च कमी होतो पण उत्पन्नातही घट येते.  सेंद्रीय खर्चात बचत केल्याने लागवडीखर्च कमी होतो पण उत्पन्नातही घट आल्याने उत्पादन खर्च कमी होत नाही.
९) बागायती शेतीत उत्पन्नात वाढ होत असली तरी ओलिताची सुविधा निर्माण करण्यास लागणारी भांडवली गुंतवणूकओलितासाठी लागणारा मजुरी खर्च आणि विद्युत/डिझेलचा खर्च वाढत जातो म्हणून शेवटी जिरायती शेती असो की बागायती शेतीउत्पादनखर्च सारखाच निघतो.
तोट्याच्या शेतीचे दुष्परिणाम :
१) शेतीत येणारी तुट भरून काढताना शेतकर्‍याचे कुपोषण होतेम्हणून शेतकरी शरीराने कृश दिसतो. शेतकर्‍याचे सरसरी आयुष्यमान कमी होते.
२) सुखाचे व सन्मानाचे जीवन जगता येत नाही.
३) मुलभूत गरजा पूर्ण करता येत नाही.
४) ग्रामीण भाग ओसाड आणि भकास होतो.
५) शेतीत येणारी तुट भरून निघत नाही म्हणून शेतकरी वारंवार कर्जबाजारी होतो.
६) कापसाची शेती करताना कधीच भरुन निघणार नाही एवढी तूट आली आणि सातजन्मात फ़ेडता येणार नाही एवढ्या कर्जाचा डोंगर उभा  राहिला कीशेतकर्‍यात नैराश्य येते.
७) आयुष्य जगण्याचे सर्व मार्ग बंद झाले कीतो मग नाईलाजाने विषाची बाटली किंवा गळफ़ासाशी सोयरीक साधून तुम्हा-आम्हा-सर्वांना सोडचिठ्ठी देतो.
    
                                                                                                                  -  गंगाधर मुटे    
————————————————————————–—————————–————-

शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे

शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे
                  शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरू आहे. या समस्येची उकल करताना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर “शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा” अशा स्वरूपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.
                शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किंवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात, तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे, पण हा देश आपण कोण्या कामचुकार, आळशी, अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला, तर त्याच्याशी वाद घालता येईल, मुजोरीही करता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक निराकरण करता येईल?
                       झोप, जेवण आणि अन्य शारीरिक विधींसाठी लागणारा काळ सोडला तर उर्वरित वेळात शेतकरी काय करतो? स्विमिंग करायला जातो? क्रिकेट / सिनेमा बघायला जातो? बायकोला घेऊन बागेत फिरायला जातो? बिअरबारवर जातो? बारबालांचे नृत्य बघायला जातो की इतवारी / बुधवारपेठेत फेरफटका मारायला जातो? मान्यवर तज्ज्ञांनी पहिल्यांदा या प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे. ( आणि जरी का या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तरीही बिघडते कुठे? सर्व उपभोगाचा भोग भोगणारी आमच्या सारखी भोगवादी मंडळी कुठे आत्महत्या करताहेत? आम्ही जिवंतच आहोत की अजून. )
औताच्या बैलाला वर्षातून फक्त १२० ते १४० दिवस तर शेतक-याला मात्र ३६५ दिवस काम करावे लागते, बाप मेला सुट्टी नाही, बापाला तिरडीवर तसाच ठेवून बैलाचे शेणगोटा, चारापाणी करायला जावेच लागते. पोरगा तापाने फणफणत असेल किंवा अगदी Gastro जरी झाला तरीही पेरणी थांबवता येत नाही हे वाजवी सत्य तज्ज्ञ मंडळींना कधी कळेल?
                 तरीही या तज्ज्ञ मंडळींना शेतकरी आळशी आणि कामचुकार दिसत असेल तर त्यांनी खालील प्रमाणे शास्त्रशुद्ध मार्गाचा अवलंब करून स्वतः:ची खातरजमा करून घ्यावी.
आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन;
१) प्रेताचे वजन करावे व शारीरिक उंची मोजावी. वजन व उंची यांचा रेशो काढावा. तो डॉक्टरला दाखवावा. मयत व्यक्ती सुदृढ की कुपोषित, कष्टकरी की कामचुकार या विषयी सल्ला घ्यावा.
२) मुखवट्याचा एक क्लोजअप फोटो घ्यावा. त्यावरून मरण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर काय भाव होते, मरण्यापूर्वी त्याची मानसिक स्थिती काय होती याचा याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून रिपोर्ट मागवावा.
३) त्याच्या घरातील नेसनीची वस्त्रे, अंथरून-पांघरून, भांडी-कुंडी यांची यादी बनवावी. त्यावरून मयत व्यक्ती काटकसरी की उधळखोर याचा अंदाज काढावा.
४) व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. तसे असेल तर तो कोणती दारू पीत होता? गावठी, देशी की इंग्लिश याचा शोध घ्यावा. गावठी, देशी आणि इंग्लिश मद्याचे अनुक्रमे बाजारभाव माहीत करून घ्यावे. (मान्यवरांना गावठी, देशीचे भाव माहीत नसणार) दरडोई येणारा खर्च याचा तुलनात्मक तक्ता/गोषवारा बनवावा. बिगरशेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण आणि शेतकरी मद्यप्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण याची आकडेवारी गोळा करून तुलना करावी.
५) अज्ञानतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. तसे असेल तर बिगरशेतकरी पण अज्ञानी अशा अन्य समुदायातील लोक आत्महत्या का करीत नाहीत? किंवा बारामतीचे लोक फारच सज्ञानी आहेत काय?
६) वेडसरपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. वेडसर लोक आत्महत्या करतात? कुठले? अमेरिकेतील? ब्रिटनमधील? फ्रांसमधील की पाकिस्तानातील?
७) मनोरुग्णपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असा काहींचा निष्कर्ष आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे त्यांना वाटते. पण ग्यानबाला हे पटत नाही. एका दाण्यातून शंभर दाण्याच्या निर्मितीचा चमत्कार घडवणारा व स्वतः: अर्धपोटी राहून जगाला पोटभर खाऊ घालणारा शेतकरी मनोरुग्ण कसा काय असू शकतो? कदाचित वैफल्यग्रस्त असू शकतो. मग तो वैफल्यग्रस्त, नाउमेद का झाला याची कारणे शोधावी. ती कारणे सामाजिक की आर्थिक याचाही शोध घ्यावा? शेतात गाळलेला घाम, दामात का परावर्तित झाला नाही याचाही शोध घ्यावा. याउलट पॅकेजची रक्कम गिळंकृत करणारे राजकीय पुढारी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणाऱ्या शासकीय मदतीचा चेक काढण्यासाठी लाच खाणारी नोकरशाही मानसिक विकृतीने ग्रासली असून त्यांच्या भावनिक संवेदना बधिर झाल्या आहेत. तेच खऱ्या अर्थाने मनोरुग्ण असून त्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये, मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असे ग्यानबाला वाटते. शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेचे शुद्धीकरण आणि मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे, ज्या अर्थी शेतीविषयक ध्येय-धोरणामध्ये मूलभूत बदल होताना दिसत नाही त्या अर्थी शेतीविषयक ध्येय-धोरणे आखणाऱ्याकडून शेतकरी आत्महत्या बद्दल व्यक्त होणारी चिंता हा वरपांगी देखावा आहे, ज्या अर्थी शेतीला न्याय देणारी कृषी विषयक धोरणे आखण्यासाठी लागणारी कणखरता त्यांच्यामध्ये नाही त्याअर्थी तेही मानसिक दुर्बल असावे असा ग्यानबाचा कयास आहे, त्यासाठी मंत्रालयामध्ये मानसोपचार शिबिरे आयोजित करावी असेही ग्यानबाला वाटते. जे ग्यानबाला उमजते ते या तज्ज्ञांना का उमजू नये? उमजत असेलही कदाचित परंतु शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या या व्यवस्थेवर उदरनिर्वाह करणारी मंडळी सिंहासनाच्या इच्छे विरुद्ध काही निष्कर्ष काढतील ही अशक्य कोटीतील बाब आहे, असेही ग्यानबाचे स्पष्ट मत आहे.
८) पॅकेजमुळे आत्महत्या थांबत नाही, असा काहींचा निष्कर्ष आहे. परंतु ते पॅकेजच्या स्वरूपावर अवलंबून आहे. कँसरच्या रोग्याला पॅरासीटामॉलचे पॅकेज द्यायचे, रोगी बरा झाला नाही अथवा दगावला की रोगी अज्ञानी होता, त्याने औषधे घेण्यात कुचराई केली, असा काहीसा बावळट निष्कर्ष काढण्याचा हा प्रकार आहे. त्या ऐवजी पॅकेजच्या मूळ स्वरूपातच गफलत झाली, रोगाचे निदान करण्यात, औषधांची निवड करण्यात चूक झाली हे कबूल करण्यासाठी लागणारी मानसिक औदार्यता आमच्यामध्ये केव्हा येणार हाच खरा लाख मोलाचा प्रश्न आहे.
                          मान्यवर तज्ज्ञांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवी. विषयाच्या खोलवर जायला हवे. अभ्यासांती निष्कर्ष काढून सप्रमाण सिद्ध करायला हवे, पण हे होताना दिसत नाही. पूर्वग्रह बाजूला सारून त्रयस्थपणे मुद्द्याची उकल केल्याखेरीज निर्दोष निष्कर्ष निघू शकत नाही. परंतु बाटली आणि पंचतारांकित संस्कृती वृद्धिंगत झालेल्या स्वनामधन्य तज्ज्ञांना याची गरज भासत नाही. एरवी शेतकरी आत्महत्या सारख्या संवेदनशील मुद्द्यावर तज्ज्ञांनी येरेगबाळे मतप्रदर्शन करण्यापेक्षा चूप बसने शेतकऱ्यासाठी समाधानाचे ठरेल. आणि कदाचित शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील मुद्द्याची उकल होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांच्या प्रारंभाचे तेच पहिले पाऊल ठरेल.
                                                             गंगाधर मुटे
…………………………………………………………………………
पुर्वप्रकाशित : १० मार्च २०१०
…………………………………………………………………………

पापाची भागीदारी

प्रिय ग्राहक मित्रहो,

यंदा कांद्याचा भाव आणि कांद्याचे भावाचे राजकारण चांगलेच गाजले. हे आपण जाणताच.
यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन प्रतिएकरी कमी आले मात्र प्रति एकरी उत्पादनखर्च एकतर दरवर्षीएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आला.
उत्पादनखर्च वाढीची कारणे:
१) वाढलेले डिझेलचे भाव
२) सेंद्रीय /रा. खताच्या वाढलेल्या किमती
३) दुपटी-तिपटीने अचानक वाढलेले शेतमजूरीचे दर.
४) अतिपावसामुळे वाढलेला मशागतीचा खर्च.

खर्च वाढलेत पण उत्पादन मात्र कमी आलेत, त्यामुळे कांदा उत्पादकाला यावर्षी कांदा पिकवायला प्रतिकिलो रू. ४०/- पेक्षा जास्त खर्च आला.
*
मागणीपुरवठ्याच्या सिद्धांतानुसार, मागणी आणि पुरवठा यात तफ़ावत आल्याने कांद्याचे भाव वाढून ७०-८० रू. पर्यंत प्रति किलो एवढे वाढलेत. त्यामुळे निसर्गाने शेतकर्‍यांशी न्याय करून त्याचा उत्पादनखर्च भरून निघेल अशी व्यवस्था केली.
*
पण विद्वत्ताप्रचूर विद्वान अर्थशास्त्र्यांनी कांगावा केला. त्यामुळे नेहमीप्रमाणेच केंद्रशासनाने कांदा निर्यातबंदी केली एवढेच नव्हे पाकिस्तान मधून कांद्याची आयातही केली. अनैसर्गिकरित्या कृत्रिमपणे कांद्याचे भाव पाडलेत.
*
आता प्रतिकिलो २ रू सुद्दा शेतकर्‍यांच्या हातात पडणार नाही, अशी शासनाने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे.
*
प्रिय ग्राहक मित्रहो,
आता स्वस्तात कांदा खरेदी करतांना तुम्हाला आनंद होत असेल तर आनंद जरूर माना.
पण आपल्याच देशातल्या गरीब, देशोधडीस लागलेल्या, कोणत्याही क्षणी आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते अशा कांदा उत्पादक शेतकर्‍याला आपण प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडत आहोत, याचीही जाणिव असू द्या.
*
भविष्यात एखाद्या कांदा उत्पादकाने आत्महत्या केली तर त्या पापाचे सुक्ष्म/अंशता आपणही तर भागीदार नाहीत ना? याचाही शोध घ्या.
*
हे निवेदन वाचून भावनाप्रधानही होऊ नका. कारण ग्राहकासमोर शेतकर्‍याला आता प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडण्याशिवाय इलाजही उरलेला नाही. फ़क्त हे स्वत:च्या मनात ठेवा.
तुम्हाला हे जर जिवाभावातून कळले, हृदयात सहानुभूती निर्माण झाली, नेमक्या प्रश्नाची जाणिव झाली तर “बुडत्याला लुटण्याच्या” पातकातून तरी नक्कीच मुक्ती होईल.
*
अनेकांना प्रश्न पडतो की शेती परवडत नाही मग शेती का करतात. एकेकाळी मलाही हाच प्रश्न पडला होता.
आता मात्र उत्तर गवसले. आत्महत्या करायची वेळ आली तरी चालेल पण तो शेती करायचे सोडू शकत नाही.

कारण,

शेतकरी हा उत्पादक आहे. आणि उत्पादकाला उत्पादन केल्याशिवाय चैन पडू शकत नाही.

उदा. मुलगा मोठा झाल्यावर तुला लाथा घालेल असे कितीही मातृत्वाला समजावून सांगीतले तरी मातृत्वाची प्रसवण्याची प्रेरणा जशी कमी होत नाही, तसेच परिणाम काहीही होवोत शेतकर्‍यांची उत्पादन करण्याची प्रेरणा काही कमी होत नाही.

पण “जालिम जमाना” हे काही लक्षात घेत नाही.
२ रुपयात किलोभर कांदा मिळतो म्हटल्यावर तो जाम खुष आहे.

गंगाधर मुटे
*******

गाय,वाघ आणि स्त्री


गाय,वाघ आणि स्त्री

                     मुंबईच्या अभिव्यक्ती ग्रंथ न्यास या संस्थेतर्फे नुकताच “गझल : सुरेश भटानंतर” हा गझलेचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. अभिव्यक्ती ग्रंथ न्यास ही समग्र मराठी गझलेच्या उत्कर्षासाठी झटणारी जनमान्यता पावलेली संस्था. कविवर्य स्व. सुरेश भटानंतर जे गझलकार झालेत त्यांच्या निवडक गझलांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला असून या ग्रंथात माझ्या तीन गझलांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला  आहे. मी गझल लिहायला लागल्यापासून आजपर्यंत काही दिग्गज गझलकारांनी मी गझलेमध्ये जसा आशय व्यक्त करतो, तो गझलियतशी मेळ खात नाही, असे म्हणून माझ्या गझलेला कमी लेखण्याचा जो प्रकार केला, त्या पार्श्वभूमीवर माझ्या गझलांचा या संग्रहात समावेश झाल्याने माझ्या गझलेतील ग्रामीण आशयाला या निमित्ताने जनमान्यतेची अधिकृत पावतीच मिळाली आहे.

                     दोन वर्षापूर्वी मराठी गझल या काव्यप्रकाराशी माझी पहिल्यांदा ओळख झाली. कवितेपेक्षा गझल हा काव्यप्रकार पूर्णपणे भिन्न असतो. लयबद्धता हा गझलेचा प्राण असतो. तंत्रशुद्धतेच्या चौकटी काटेकोरपणे सांभाळूनच गझल जन्माला येते. मुक्तछंद किंवा छंदमुक्ततेला गझलेत काहीही स्थान नसते. वेगवेगळ्या तर्‍हेचे पाचपेक्षा जास्त विषय एकाच रचनेत प्रभावीपणे हाताळण्यासाठी गझलेसारखा दुसरा पर्याय असूच शकत नाही. ह्या गोष्टी माझ्यावर एवढा मोठा प्रभाव पाडून गेल्यात की मला गझल या काव्यप्रकाराचे अक्षरशः वेड लागले आणि मी गझलेच्या प्रेमात पडलो.

                     गझल लिहिणे हे थोडे कलाकुसरीचेच काम असते. काव्य स्फुरले तर कविता लिहिली जाऊ शकते, गझल लिहिली जाऊ शकत नाही. गझल हा तसा कृत्रिमरीत्या काव्य हाताळण्याचा प्रकार आहे. स्फ़ूर्तीमुळे एखाद्या लयबद्ध शेराची किंवा मतल्याची निर्मिती होऊ शकेल; पण उर्वरित चार किंवा त्यापेक्षा जास्त शेर मात्र मतल्यात निश्चित झालेल्या जमिनीला म्हणजे बहर (वृत्त), काफ़िया (यमक)  आणि रदीफ (अंत्ययमक) अनुसरून जाणीवपूर्वकच रचावे लागतात. मी तसा गझलेचा अभ्यासक किंवा फारसा वाचकही नाही; पण ज्या काही गझला माझ्या वाचण्यात आल्या त्यात ग्रामीण सुखदु:खाचे पदर असलेली गझल मला आढळलीच नाही. शेती आणि शेतकरी या शब्दांचा गझलेशी दूरान्वयानेही संबंध मला तेव्हाही आढळला नाही, आजही आढळत नाही. अरबीतून फारसीत व फारसीतून उर्दू भाषेत दाखल झालेला हा काव्यप्रकार आता सर्वच भारतीय भाषांत दाखल होऊ पाहत आहे. मराठी भाषेतही गझल हा काव्यप्रकार बर्‍यापैकी रुजलेला आहे. सर्वसाधारणपणे “शराब आणि शबाब” याविषयाभोवतीच पिंगा घालणार्‍या पारंपरिक गझलेला मराठी गझलेने फाटा देऊन सामाजिक आशयाची झालर दिली असली तरीसुद्धा विशिष्ट साचेबंद आशयाच्या बाहेर पडून मराठी मातीचा सुगंध पुलकित करण्यार्‍या आशयाकडे झेप घ्यायची उत्कंठा मराठी गझलेत अजूनही जागृत झाल्याचे जाणवत नाही. ज्या देशातला बहुसंख्य समाज अनादीकाळापासून शेती याच एकमेव व्यवसायावर गुजराण करीत असला आणि स्वतः अर्धापोटी राहून इतरांना पोटभर जेवू घालत असला तरी शेतीक्षेत्राचे वास्तववादी चित्र प्रतिबिंबित करण्यात जिथे संपूर्ण साहित्यक्षेत्रानेच शेतीक्षेत्राची उपेक्षा केली तिथे नवख्या मराठी गझलेला दोष देण्यात अर्थ नसला तरी या दिशेने पाऊल टाकण्याचे प्रयत्न न होणे, ही मात्र साहित्यक्षेत्राला फारशी शोभादायक बाब खचितच नाही. गझलेला शेतीच्या बांधवर आणून सोडायचे असेल तर त्यासाठी कोणीतरी गझलकार पुढाकार घेईल याची वाट पाहात बसण्यापेक्षा आपणच गझल लिहिण्याचा प्रयत्न का करू नये? अशी माझी भावना झाली आणि मी गझल लिहायचे ठरवले.

                     मी गझल लिहायचे ठरविले तेव्हा तंत्रशुद्धता आत्मसात करणे ही अभ्यासाने साध्य करण्यासारखी बाब आहे, याची मला जाणीव होती. मुख्य प्रश्न होता आशयाचा. आलंकारिक भाषेत शारीरिक प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी गझल लिहिणे हा माझा प्रांत नव्हता. तरुण, तरुणी, प्रेमरस, प्रेमभंग किंवा तिचा गजरा, तिच्या नजरा, तिचे चालणे, नटकणे, लचकणे, गालात खळी पडणे या विषयावर एवढ्या गझला लिहिल्या गेल्या आहेत की मी आणखी पुन्हा याच विषयावर गझल लिहावी असे मला वाटत नाही. आधीच कुण्यातरी गझलकाराने लिहिलेल्या ओळींची मोडतोड करून किंवा शब्दांची अदलाबदल करून शेर किंवा गझल रचायची आणि ती आपल्या नावावर खपविण्यासाठी लागणार्‍या वृत्तीची माझ्याकडे वानवा आहे. शिवाय शेती आणि ग्रामीण जीवन हाताळता येत नसेल तर गझल लिहायची हौस तरी कशासाठी बाळगायची? हा मला पडलेला प्रश्न.


                     
गझलेतील लयबद्धता, वृत्ताची हाताळणी, यमकाचे नादमाधुर्य आणि एकाच गझलेत पाचपेक्षा जास्त वेगवेगळे विषय हाताळायची संधी, हे गझलेने मला वेड लावण्याचे मुख्य कारण होते. त्यामुळे गझल लिहिण्याचा मोह काही केल्या टाळताही येईना. शेवटी ठरले की आपण जे काही लिहायचे, ते शेतीविषयाला अनुसरूनच लिहायचे. गझलेतील आशयाच्या प्रांतात सुद्धा चिरयौवणी ललनेचे मोहक डोळे किंवा शरीरसौंदर्य प्रकटीत करणार्‍या अवयवाऐवजी आपल्याच शेतातील वांगे, टमाटर, आंबे, चिक्कू, पेरू, गाय, बैल, वासरू इत्यादींना सोबत घेऊन गझलप्रातांत शिरायचे. निर्णय झाला आणि लेखनी उचलली. पहिल्याच प्रयत्नात थोडीशी सूट घेतलेली आनंदकंद या वृत्तातील माझी पहिलीवहिली गझल आकारास आली…. 

गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळींची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही.

रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही.

खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही

अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.

                     ही गझल सहा संकेतस्थळावर प्रकाशित केल्यावर रसिकाकडून जोरदार स्वागत झाले. पहिलीच गझलरचना असल्याने कौतुकही झाले पण; दबक्या आवाजात का होईना, भाषाशुद्धता व तंत्रशुद्धतेतील दोन निकष पाळले गेले नसल्याची खंतही व्यक्त झाली. देण्या ऐवजी देण्यास आणि जोजविण्या ऐवजी जोजविण्यास असे असायला हवे होते आणि तसे केले तर वृत्त बिघडणार होते. दुसरा मुख्य नियम असा की, मतल्याच्या किंवा शेराच्या पहिल्या ओळीत विषयाची प्रस्तावना व दुसर्‍या ओळीत पहिल्या ओळीत जी प्रस्तावना व्यक्त झाली असेल तिचा प्रभावी समारोप असायला हवा. शेरातील दोन ओळींचा परस्पर संबंध असायलाच हवा. त्यामुळे 


गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

                     हा मतला डोक्यावरून डोक्यावरून गेल्याच्या किंवा काहीही अर्थच लागत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्यात. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभूमी उलगडण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या मते त्या मतल्याचा अर्थ खालीलप्रमाणे असू शकतो.


बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.
दोघीही शारीरिक अंगाने अबलाच. स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.
निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही ‘हत्यारे आणि ढाली’ दिल्या आहेत.
उदाहरणार्थ, उंदराला बिळात घुसता येते, मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे उंदराचे रक्षण होते.
याच अर्थाने मांजरीला भिंतीवर चढता येते, कुत्र्याला भिंतीवर चढता येत नाही.
या झाल्या उंदीर आणि मांजरीच्या स्वसंरक्षणाच्या ढाली.
याच प्रमाणे आपल्या दात आणि नखांचा वापर करून कौशल्याने अन्न मिळविण्यासाठी उपयोग करणे हे झाले उंदराचे हत्यार.
त्याच प्रमाणे मांजर शिकार मिळविण्यासाठी ज्या ज्या अवयवांचा वापर करते ते झाले मांजरीचे हत्यार.
मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी २-३ उदाहरणे बघूयात.
हरणाला वाघ-सिंहापेक्षा आणि सशाला त्याच्या शत्रूपेक्षा अधिक वेगवान वेगाने पळता येते.
माकडाला झाडावर चढता येते. मोराला बचावापुरते उडता येते.
मुद्दा एवढाच की बचावासाठी सजीवाकडे नैसर्गिकरीत्या हत्यार/ढाल/कौशल्य यापैकी काहीतरी नक्कीच आहे.
मात्र मानव जात आणि त्याचे बहुतेक पाळीव प्राणी यांचेकडे निसर्गत: यापैकी काहीही नाही.
निदान मानवाकडे बुद्धी आणि साधने बनविण्याची कला तरी आहे.
मानवाने बुद्धीचा वापर करून साधने बनविली आणि त्या साधनांचा हत्यारासारखा उपयोग करून संपूर्ण सजीव सृष्टीवर हुकुमत मिळविली. हातात साधन नसेल तर मानवाएवढा दुर्बल कोणीच नाही. विनाहत्याराने मनुष्य साध्या मधमाशीसोबत सुद्धा लढू शकत नाही. साधनविरहीत माणसाला, कावळासुद्धा पराजित करू शकेल.
पण गायीचे काय? गाय पूर्णतः संरक्षणासाठी मानवावर अवलंबून.
कल्पना करा. (कल्पना काय फक्त कवींनीच करायच्या? आणि रसिकांनी फक्त टाळ्या वाजवायच्या?)
कल्पना करा की जर उद्या मानवाला गाय निरूपयोगाची आणि परवडेनाशी वाटली तर माणूस गायीचा त्याग करणार. कारण नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभावच.
गायीवरचे प्रेम, भूतदया वगैरे दिखावाच. जर तसे नसते तर गाय फक्त शेतकर्‍यांच्याच दारात नसती दिसली.
गाय दिसली असती कलेक्टर, मंत्रालय, राजकीय पक्षांची कार्यालये वगैरे ठिकाणी गाय बांधलेली आढळली असती आणि सकाळी उठून कलेक्टर शेण सावडतांना आणि मुख्यमंत्री दूध काढताना आढळले असते.
मग नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभाव असलेल्या माणसाने गायी पाळणे बंद केले तर काय होईल? गायीचे काय होईल?
वाढत्या यांत्रिकीकरणाने बैलांची गरज संपत चाललेली.
दुधाच्या किंमती आवाक्यात आहे तोपर्यंत ग्राहक दूध पिणार.
यदाकदाचित दुधाचे भाव ५०० रु. प्रतीलीटर झालेत तर निव्वळ गायीच्या प्रेमापोटी दूध खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या किती?
जर अशी स्थिती उद्भवली आणि दुधाचा धंदा न परवडणारा झाला तर कोणी कशाला गायी पाळतील? मग अशा विपरीत परिस्थितीत माणूस गायीचा त्याग करणारच.
मग गायीचे काय होईल? कशी जगेल बिचारी?
जंगलात ती शत्रूपासून स्वसंरक्षण करू शकत नाही कारण गायीला ना बिळात घुसता येत, ना झाडावर चढता येत, ना हवेत उडता येत, ना अती वेगाने पळता येत. शत्रुशी दोन हात करायला ना दात ना नखे, ना हत्तीसारखे शक्तिशाली सोंड.
शेपटी आणि शिंगांची ताकत व धार उत्क्रांतीच्या प्रवाहात क्षीण झालेली.
मग ती स्वबचाव कशी करेल?
तेव्हा तिला तिच्या संरक्षणार्थ गरज पडेल एका बलशाली सहकार्‍याची. मग तो सहकारी कोण?
गायीला जेवढे नैसर्गिक शत्रू आहेत त्या सर्वांना पराभूत करून गायीला जीवदान, अभय देण्याची शक्ती केवळ सिंह, वाघापाशीच. सिंह, वाघाशिवाय गायीचे रक्षण कोणीच करू शकत नाही.
आणि नेमकी येथेच बंडी उलार होते.
जो गायीचे रक्षण करू शकतो तोही तिचा शत्रूच.
गाय वाघाकडे अभय मागण्यास गेली तर वाघोबा तिला अभय देण्याऐवजी तिच्यामध्ये आपले खाद्य शोधणार.
भूक शमविण्याची वस्तू या नजरेने पाहणार.
ज्याच्याकडे आश्रयाला जावे तोच काळशत्रू ठरणार.
कारण..
वाघाकडे जे दात आहेत ते गायीला खाण्यासाठीच…
तिचे प्राण वाचवू शकेल, अभय देऊ शकेल, असे दात वाघाजवळ आहेतच कुठे?
ज्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा केली जाऊ शकते तोच जर भक्षक ठरणार असेल तर………….
म्हणून गाय आणि स्त्री या दोघीत याच अनुषंगाने विचार केला तर दोघींच्याही व्यथा सारख्याच वाटतात मला.

”गायीस अभय देण्या,वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या,सूर्यास हात नाही.”

                                                                                                                            – गंगाधर मुटे
—————————————————————————————————

शेतकरी पात्रता निकष

  शेतकरी पात्रता निकष.

                  मायबोली या संकेतस्थळावर मला एक प्रश्न विचारण्यात आला की “एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल – आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल तुमचा अनुभव/मते सांगा – प्लीज! “असा प्रश्न विचारला आहे. अशा तर्‍हेच्या प्रश्नाला उत्तर तरी काय द्यावे?.
             कारण या प्रश्नाचे उत्तर माझ्यासाठी फारच अवघड आहे. असा प्रश्न मला आजवर कोणी विचारलाच नव्हता. “इधरसे बाहर निकलनेका रस्ता है, अंदर आनेके लिये रस्ता तो हैही नही”.
शेती सोडून जे अन्यत्र गेले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले याउलट जे बाहेरुन शेतीत आले ते गेले, कामातूनच गेले, मातीमोल झाले.
               हे जर मला माहीत असेल तर मी काय माहिती द्यावी? आम्ही कवी माणसं. कविता करताना पतंगाला सहज अग्निज्योतीवर उड्डाण घ्यायला सांगतो आणि प्रेमाच्या आहुतीची महती गातगात कविता पूर्णं करतो. पण जित्याजागत्या जीवाला शेती करायला लावणे म्हणजे खोल डोहात बुडण्यासाठी आमंत्रीत करण्यासारखे आहे, हे मला पक्के ठाऊक आहे, तरीपण मी उत्तर द्यायचा माझ्यापरी प्रयत्न करणार आहे.
.
या प्रश्नाचे दोन विभाग पडतात.शेती कशासाठी करायची ?
अ) हौसेखातर शेती. (उपजीविकेसाठी अन्य सोर्स आहेत अशांसाठी.)
                      हौसेखातर शेती करायची असेल तर कशाचीच अडचण नाही. घरात दोन पिढ्या जगतील एवढी संपत्ती असेल, पुढारीगिरी करून माया जमविता येत असेल किंवा घरातले कोणी सरकारी नोकरीत असून पगाराव्यतिरिक्त माया जमविण्याचे अंगी कौशल्यगूण असेल तर त्यांच्यासाठी काळ्या पैशाला पांढर्‍यात रूपांतरित करण्यासाठी शेती एक वरदानच ठरत आली आहे.
ब) उपजीविकेसाठी शेती.
                      उदरभरणासाठी शेती ( उदरभरण हाच शब्द योग्य. लाईफ बनविणे, करिअर करणे, जॉब करणे सारखे शब्द सुद्धा येथे फालतू आहेत.) करायची असेल तर मग गंभीरपणे विचार करावा लागेल.त्यासाठी कायकाय हवे आणि कायकाय नको अशा दोन याद्या कराव्या लागतील.
१] प्रथम आर्थिक खर्चाची यादी करू.अंदाजे किमतीसह.
१) १० एकर शेतजमीन………२०,००,०००=००
२) बांधबंदिस्ती : ………………..२०,०००=००
२) विहीर पंप :…………………१,५०,०००=००
३) शेती औजारे :………………. ३०,०००=००
४) बैल जोडी :………………….. ६०,०००=००
५) बैलांचा गोठा :…………… १,००,०००=००
६) साठवणूक शेड :…………..१,००,०००=००
———————————————–
एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
———————————————–
सर्वसाधारणपणे अंदाजे २५,००,०००=०० एवढी भांडवली गुंतवणूक करावी लागेल.
शारीरिक गरजा :
१) त्वचा जाडी भरडी असावी.सहजासहजी काटा रुतायला नको.
२) रंग घप्प असावा.शक्यतो डार्क ब्लॅक.
३) गोरा,निमगोरा,गव्हाळी वगैरे रंग इकडे घेऊन येऊ नये.चार-सहा महिन्यातच रंग बदलण्याची हमखास शक्यता.त्यासाठी एक उन्हाळा पुरेसा आहे.
४) पायांना चपलेची आदत नसावी.चिखलात चप्पल चालत नाही.
५) शरीरात रक्त जास्त नको,जेमतेम असावे कारण काटा रुतला तर भळभळा वाहायला नको.
६) हाडे कणखर आणि दणकट असावी.
७) शरीरात चपळता असावी.बैल पळाल्यास धावून पकडता येणे शक्य व्हावे.
८) ५०-६० किलो वजन २-४ किलोमीटर वाहून नेण्याची क्षमता असावी.
मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच ” रघुपती राघव राजाराम” हे गीत घरासमोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता……राम नाम सत्य है…
२) हांजीहांजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्‍यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हांजीहांजी केल्यावाचून गत्यंतर नसते.
३) मिनतवारी करणे हा अंगीभूत गुण असावा कारण प्रत्येक ठिकाणी उधारीपाधारी शिवाय इलाज नसतो.
४) आत्मसन्मान वगैरे वगैरे अजिबात नको.हमालानेही अरे-कारे,अबे-काबे म्हणून दोन शिवा हासडल्या तर वैषम्य वाटायला नको.शेतकर्‍यासोबतची सर्वांची बोलीशैली ठरली आहे.७० वर्षाच्या शेतकर्‍याला १२ वर्षाचा व्यापारी पोरगा सुद्धा याच भाषेत बोलत असतो.
५) मुलाबाळांना उच्चशिक्षण द्यायच्या महत्त्वाकांक्षा नकोत.नाहीतर अपेक्षाभंग व्हायचा.
६) चांगले जीवनमान जगण्याची हौस नसावी.अनेक पिढ्या उलटूनही तसे शक्य होत नाही.
७) थोडाफार मुजोरपणा हवा.
सावकार – बँका कर्जवसुली मागण्यास आल्या तर – पुढच्या वर्षी देतो, होय देतोना, पळून गेलो काय, होईन तवा देईन, नाही देत जा होईन ते करून घे. अशी किंवा तत्सम उत्तरे देता आली पाहिजेत.तरच चार वर्षे पुढे जगता येईल.
८) मनाचा हळवेपणा अजिबात नको. जर का तुम्ही संवेदनाक्षम-हळव्या मनाचे असलात तर चार लोकात झालेली फटफजिती सहन न झाल्याने गळफास लावून घ्यायचे.म्हणून मुजोरपणा हवा हळवेपण अजिबात नकोच.
९) पंखा,कूलर,फ्रीज,टीव्ही वगैरेची आवड नको. दिवसभर शेतात काम झाले की आलेला शीण-थकवा एवढा भारी की खाटेवर पडल्याबरोबर ढाराढूर झोप लागत असते.
१०) विचार करण्याची प्रवृत्ती नको नाहीतर चिंतारोग व्हायची भिती.
कायदेशीर गरजा:-
कायदेशीर ज्ञान नसले तरी चालते. खिशात पैसे असेल तर हवा तेवढा सल्ला वकील मंडळीकडून घेता येतो.
माझ्या मते जर कोणाला नव्याने शेती करायची (गावरानी भाषेत जिरवून घ्यायची) हौस असेल तर त्यांनी एवढा विचार नक्कीच करायला हवा.
देशाच्या पोशिंद्याची ही चार प्रश्नांची कहाणी अठरा उत्तरी सुफळ संपुर्णम…..!
पोशिंद्याचा विजय असो….!!
२५-०१-२०१०                                                 गंगाधर मुटे
===========================================

शेतीवर आयकर का नको?

शेतीवर आयकर का नको?

शेतीवर आयकर का नको?
शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
         त्या ताळेबंदावरून या व्यवस्थेने दडवून ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासमोर येईल.  देशातील १०० टक्के शेतकर्‍याची शेती पूर्णतः तोट्याची आहे, याला अधिकृत दुजोरा मिळेल. शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकीय दाव्याचा फुगा फुटून जाईल.(तसाही गॅट समक्ष सादर केलेल्या कागदपत्रात अधिकृतपणे तो फुगा फुटलाच आहे.)
या देशात पुढारी आणि शासकीय कर्मचारी यांच्याच तेवढ्या शेत्या फायद्यात बाकी सर्व तोट्यात हेही देशाला अधिकृतपणे कळेल.
         घरात पोटभर खायला नसूनही, मिशीवर ताव देऊन पाटिलकीचा खोटा आव आणणार्‍यांचे सत्य स्वरूप समाजासमोर येईल.
         आणि काळ्या चलनाचे पांढर्‍या चलनात रुपांतर करण्यासाठी, दोन नंबरची कमाई एक नंबर मध्ये रुपांतरीत करण्यासाठी जो शेतीच्या नावाखाली धुडगूस चाललाय, त्यालाही पायबंद बसेल.
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर त्याच्या घरात आलेली मालमत्ता कशी, कुठून आली याचे तो स्पष्टीकरण काय देईल ?
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर तो उत्पन्नाचे साधन काय दाखवील?
शेतीला आयकर लावल्यास शेतकरी सोडून ते इतरांनाच जास्त अडचणीचे आहे.
आयकर लावल्यास गरीब शेतकर्‍यांचे काय होईल असे जर कुणी बेंबीच्या देठापासून ओरडत असेल तर त्यांना “माझं काय होईल’, असे म्हणायचे आहे असा अर्थ काढायला आपण शिकले पाहिजे.
शेतकर्‍यावर उत्पन्नावर आधारीत आयकर लावायला हरकत नाही मात्र त्याऐवजी प्रोफेशनल टॅक्स सारखे मोघम टॅक्स लावू नयेत, नाहीतर ते शेतकर्‍यांना लुटायचं नवे हत्यार ठरेल.
आयकराला शेतकर्‍यांनी भिण्याचे काहीच कारण नाही, कारण…
ज्याला आय नाही त्याला कर नाही आणि ज्याला कर नाही त्याला डर नाही.
भाजल्या कोंबड्याला विस्तवाची कुठली आली भीती ?
शेतकर्‍यांना पिढ्यानपिढ्या लाचारासारखे जीवन जगण्यापेक्षा आर्थिक सुदृढ होऊन आयकरदाता शेतकरी म्हणून सन्मानाने जगायला नक्कीच आवडेल.
………………………………………………………………….
बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१)  बांधबंदिस्ती :          २००००=००
२)  विहीर पंप :           १५००००=००
३)  शेती औजारे :         ३००००=००
४)  बैल जोडी :             ६००००=००
५)  बैलांचा गोठा :       १०००००=००
६)  साठवणूक शेड :    १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च :  ४६००००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :                २५००० रु
नांगरट करणे :           ८००० रु
बियाणे :                  १६००० रु.
रासायनिक खते :      १२००० रु
निंदण खर्च :            १५००० रु.
कीटकनाशके :         १६००० रु.
संप्रेरके :                  ३००० रु.
सुक्ष्मखते :             १२००० रु.
फवारणी मजुरी :      ३००० रु.
कापूस वेचणी :        २४००० रु.
वाहतूक खर्च :          ६००० रु.
ओलीत मजुरी :      १२००० रु.
वीज बिल :              ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड :       २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज :             ४६०००=००
…. चालू गुंतवणुकीवरील व्याज :          १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा :      ४६०००=००
—————————————————
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क            २५०००० = ००
—————————————————
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत                    १८०००० = ००
————————————————–
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क             २,५०,००० = ००
ग) एकूण उत्पन्नाची बाजार किंमत          १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा                                        ०,७०,००० = ००
————————————————–
.
.
                     वरीलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, त्रुटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.
उत्पादनखर्च काढताना मी गृहीत धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करू शकतो,आणि १ विहीर १० एकराचे ओलित होऊ शकते असे गृहीत धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहीत धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरून त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला आहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषी विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
================================
दिनांकः- ३०.१२.०९
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती :             २००००=००
२) विहीर पंप :                  ००००=००
३) शेती औजारे :             २००००=००
४) बैल जोडी :                 ४००००=००
५) बैलांचा गोठा :           १०००००=००
६) साठवणूक शेड :         १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च :    २,८०,०००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :                       ००००० रु
नांगरट करणे :                  ८००० रु
बियाणे :                         १६००० रु.
रासायनिक खते :             १२००० रु
निन्दन खर्च :                  १०००० रु.
कीटकनाशके :                १०००० रु.
संप्रेरके :                         ०००० रु.
सुक्ष्मखते :                      ०००० रु.
फवारणी मजुरी :             ३००० रु.
कापूस वेचणी :              १२००० रु.
वाहतूक खर्च :                 ३००० रु.
ओलीत मजुरी :               ०००० रु.
वीज बिल :                     ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड  :             २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) :            ७६,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
…. चालू गुंतवणुकीवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क          १,३७,००० = ००
————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत                  ९०,००० = ००
————————————————–
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क ……     .१,३७,००० = ००
ग) एकूण उत्पन्नाची बाजार किंमत…..      ०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा……………………………. ०,४७,००० = ००
————————————————-
.
.
             वरीलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, त्रुटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.
उत्पादनखर्च काढताना मी गृहीत धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करू शकतो,असे गृहीत धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहीत धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरून त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला आहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषी विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
——————————————-
दिनांक :- ०३-०१-२००९
अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती :                   ५०००=००
२) विहीर पंप :                    १५००००=००
३) शेती औजारे :                  ३००००=००
४) बैल जोडी :                      ३००००=००
५) बैलांचा गोठा :                १०००००=००
६) साठवणूक शेड :              १०००००=००
————————————————
एकूण भांडवली खर्च :        ४,१५,०००=००
————————————————
अ) चालू खर्च..
शेण खत :                ६००० रु
नांगरट करणे :         २००० रु
बियाणे :                  ४००० रु.
रासायनिक खते :       ३००० रु
निंदण खर्च :             ४००० रु.
कीटकनाशके :          ४००० रु.
संप्रेरके :                  १००० रु.
सुक्ष्मखते :               १००० रु.
फवारणी मजुरी :       १००० रु.
कापूस वेचणी :         ६००० रु.
वाहतूक खर्च :          २००० रु.
ओलीत मजुरी :        ३००० रु.
वीज बिल :              २००० रु.
बैलाची ढेप/पेंड :       २००० रु.
————————————————-
एकूण खर्च (अ) :  ०,४१ ,००० = ००
————————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज :          ४००००=००
…. चालू गुंतवणुकीवरील व्याज :         ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा :    ४००००=००
————————————————
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क        १,२६,००० = ००
————————————————
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत                ४५००० = ००
—————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क        १,२६,००० = ००
ग) एकूण उत्पन्नाची बाजार किंमत        ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा                                   ०,८१,००० = ००
————————————————–
.
               वरीलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, त्रुटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.
उत्पादनखर्च काढताना मी गृहीत धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहीत धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरून त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला आहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषी विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
२६-१२-२००९                                            गंगाधर मुटे
=========================================

गंधवार्ता….. एका प्रेताची!

गंधवार्ता….. एका प्रेताची!

“दाsssदा, भाऊ गेलाsssss रेsssssss”
                     असा आर्त टाहो कानावर आदळताच आपल्या कामात मग्न असलेला भरत खाडकन भानावर आला. नजर उचलून पाहताच त्याला समोर जे दृश्य दिसलं ते पाहून तो हादरून गेला. काहीतरी भयानक विपरीत घडलंय याची जिवंत वार्ता घेऊन ती बातमीच त्याच्याकडे धावत येत होती.
                  भरत गव्हाणकर म्हणजे एक उच्चविद्याविभूषित आणि तेवढंच सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व. बुद्धिमत्तेच्या बळावर गावामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचंच, असा मनाचा पक्का हिय्या करून शहर सोडून गावात राहायला आलेला. चांगली महिन्याकाठी भरपूर वेतन आणि भत्ते देणारी शासकीय नोकरी सोडून दिली आणि शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्याला इतिहास बदलायचा होता पण इतिहास बदलला नाही उलट इतिहासाचीच पुनरावृत्ती झाली, इतिहासानेच त्याचे जीवन बदलून टाकले. गावात आजवर जे इतरांच्या बाबतीत घडत होतं तेच भरत गव्हाणकरच्या बाबतीत घडलं. शेतीतून काही वरकड मिळकत मिळविण्याऐवजी, बापा-आज्याने पोटास गांजवून जे काही नगदी चार पैसे, सोनं-नाणं लेकासाठी जमवून ठेवलं होतं, तेही शेतीत गमावून बसला होता. सर्व बॅंकाचा थकबाकीदार झाला होता. खाजगी सावकारांनी त्याच्यासाठी दरवाजे केव्हाच बंद केले होते. थोडक्यात सांगायचं तर “हातावर आणणे आणि पानावर खाणे” येथपर्यंत त्याची प्रापंचिक हालत हलाखीची झाली होती. पण नियतीचे वार सोसूनही न डगमगता त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारा भरत तेवढ्याच ताकदीनिशी येणार्‍या भविष्याशी समर्थपणे लढत होता. आर्थिक स्थितीने खचला असला तरी त्याच्या मनमिळाऊ स्वभावाने आणि लोकांच्या सुखदु:खात समरस व्हायच्या त्याच्या गुणवैभवामुळे मात्र गावांत त्याला खूप मानमरातब मिळायला लागला होता व गावकरी त्याच्याकडे आदरभावाने पाहायला लागले होते.
शेतीची संपूर्ण कामे करून झाली की उरलेल्या फावल्या वेळात रेडिओ,टीव्ही दुरुस्ती करून चार पैसे मिळवायचे असा त्याने नवा जोडधंदा सुरू केला होता. त्यामुळे दोन सांजेशी गुजराण व्हायला थोडा हातभार लागला होता.
                  त्यादिवशीही तो असाच एक टीव्ही दुरुस्ती करीत बसला होता. संपूर्ण टेबलभर व्हॉल्व, कंडेन्सर, कॅपॅसिटर, मल्टीमिटर अस्ताव्यस्त पडलेले होते. बाजूलाच लालभडक झालेला तप्तगरम कैय्या(सोल्डरिंग मशीन) व २४० व्होल्टचा विद्युत प्रवाह इकडेतिकडे पळवत नेणारे अर्धवट अवस्थेत खुले असणारे वायर्स सभोवताल पसरले होते.
भरत शांतचित्ताने टीव्ही दुरुस्त करण्यात मग्न झाला होता. आणि तेवढ्यातच त्याच्या कानावर एक आर्त टाहो येऊन आदळला.
“दाsssदा, भाऊ गेलाsssss रेsssssss”
                  पिसाटल्यागत सुसाट वेगाने, जिवाच्या आकांताने टाहो फ़ोडत शेवंता धावत आली आणि त्याला काही कळायच्या आतच त्याच्या गळ्याला बिलगली.
            क्षणभर भरत हादरलाच. काहीतरी अघटित घडल्याच्या शंकेच्या कारणापेक्षाही सभोवताल विखुरलेल्या जिवंत विजप्रवाहाच्या खुल्या तारा हे हादरण्यामागचे प्रमुख कारण होते. शिवाय टीव्हीमध्ये पिक्चर ट्यूब प्रकाशमान व्हावी म्हणून “पॉवर सेक्शन” भागात प्रचंड दाबाची विद्युतशक्ती तयार होत असते. नेमका तेथे जर मानवीस्पर्श झाला तर थेट मृत्यूच किंवा शरीराचा किमान एखादा अवयव/भाग कायम निकामी होण्याची हमखास खात्रीच.
                   शेवंता गळ्याला बिलगल्याने तिच्यासोबत त्याचाही तोल डळमळलाच होता. त्यामुळे शरीराचा कोणताही भाग कधी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येईल सांगता येत नव्हते. पण असे म्हणतात की आणीबाणीच्या क्षणी माणसाची विवेकबुद्धी शांत असली तर आलेल्या प्रसंगावर मात करण्यासाठी संकट धावून येण्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने बुद्धी संरक्षणाचे शस्त्र शोधायला लागते आणि क्षणार्धात उपायाचे मार्ग सुचायला लागतात. आणि तेच झाले. भरतने एकही क्षण न दवडता स्वतःचा तोल सावरून दोन्ही हाताने शेवंताला अलगद छातीपर्यंत उचलून घेतले आणि तिथून बाहेर आला.
तोवर बाहेर पन्नास-साठ लोकांचा जमाव जमला होता. कुणीतरी धावत जाऊन ग्लासभर पाणी आणून शेवंताला पाजले. पण शेवंताच्या तोंडून भाऊ….भाऊ….. भाऊ यापुढे शब्दच फुटेना.
“आवं तोंडानं सांग की, काय झालं त्ये” एक आजीबाई समजावणीच्या स्वरात बोलली.
“जे व्हाचं आसन त्ये झालं एकदा, आमालेबी माहीत होऊ दे ना, का झालं त्ये” सरस्वती काकू
“ताई नुसते रडून काय होणार? थोडा धीर धरून सांगा की आम्हाला” भरतची पत्नी अर्चना.
 आता शेवंताने स्वतःला सावरले होते, त्यामुळे थोडावेळ स्तब्धता पसरली.
आणि शेवंता सांगायला लागली. 
“मी वावरात कापूस वेचत व्हती. बाजूच्या रस्त्याहून एक फटफटी गेली. माह्या माहेरचा त्या फ़टफ़टीवर बसलेला मांगचा माणूस म्होरच्याले डगर्‍याने सांगत व्हता की अर्जुन आणि त्येची बायको दोघबी मेल्येत म्हून. म्या आइकलं आनं त्येला डगर्‍याने आवाज देल्ला, पण थे लई दूर निघून गेले व्हते.”
“अगं मग तो अर्जुन म्हणजे तुझाच भाऊ असेल कशावरून. दुसरा कोणीही असू शकते. तू तसं फारसं काही मनाला लावून घेऊ नकोस” भरत समजावणीच्या स्वरात सांगायला लागला.
“म्या बी थेच म्हंते. उगच दोरीले साप म्हणून भुई कायले ठोपट्टे बाप्पा?” सरस्वती काकूंनीही भरतचीच री ओढली.
“नाय नाय, माहा आत्मा गाही देत्ये की कायबी तरी इपरीत झालंच हाय, थे काय नाय. दादा तू लवकर फटफटी काहाड. आपल्याले लगबगीनं गेलं पाह्यजे” एका हातात पदराचा शेला घेऊन डोळे पुसत शेवंता बोलत होती.
                  शेवंताचं माहेर सोनेगाव फारसं लांब नव्हतं. केवळ १३ किमी अंतरावर. शेवंताचा भाऊ अर्जुन म्हणजे भरतचा वर्गमित्र. त्यामुळे सोनेगाव भरतच्या परिचयाचाच गाव. भरतने डोळ्यासमोर सोनेगावचं दृश्य उभं करून गावात दुसरा कोणी अर्जुन असावा काय, याचा शोध घेतला पण या अर्जुन व्यतिरिक्त दुसरा कोणी अर्जुन डोळ्यासमोर येईचना. म्हणून भरतच्या हृदयगतीचे ठोके जोरजोराने धोक्याची घंटा वाजवायला लागलेच होते.
भरतकडे मोटरसायकल नाही आणि त्याला शेवंताला घेऊन लगोलग सोनेगावला जाणे आवश्यक आहे, हे ताडून सरपंच विश्वासदादांनी आपली होंडा आणून समोर उभी केली आणि चाबी भरतच्या हातात देत म्हणाले.
“भरतराव तुम्ही शेवंताला घेऊन निघा लवकर आणि पोचल्यापोचल्या आम्हांस फोन करा.”
भरत आणि शेवंता सोनेगावात पोहचले तेव्हा गावातली निस्तब्ध शांतता आणि गावकर्‍यांचे पाणी उतरलेले चेहरे पाहून भरतची हृदयगती अधिकच वाढायला लागली होती.
आणि हे काय? अर्जूनच्या घरासमोर गर्दी?
ती घटनाच खोटी असेल किंवा दुसराच कोणीतरी अर्जुन असेल, अशी आतापर्यंत मनसमजावणी करत स्वतःस सावरणार्‍या शेवंताचा आता मात्र धीर सुटायला लागला होता.
गर्दीतून वाट काढत दोघेही कसेबसे अंगणात पोहचले. आणि ते दृश्य पाहून शेवंताने जिवाच्या आकांताने टाहो फोडला.
भाssssऊ हे का केलंssssssss रे ssss????
एखाद्या कठीण काळजाच्या माणसाचेही हृदय फाकून……वितळून पाणी-पाणी व्हावे, असेच ते दृश्य.
गळ्यात दोर लटकवून अर्जुन बोरीच्या झाडाला झुलत होता.
समोरच अगदी १५ फुटावर अर्जुनची बायको नीलिमा दोन्ही हात पसरून उपडी निपचीत पडली होती.
हे दृश्य पाहून भरतला भरून आलं. डोळ्यातून टपटप आसवे गळलीत.
                       पण हे असे का व्हावे त्याला कळेना. अर्जुनला गळ्यात फास लटकवून झुलताना पाहून नीलिमा त्याच्या दिशेने धावली असेल आणि धावता धावताच भावनांचा उद्रेक होवून अचानक हृदयगती थांबल्याने ती तेथेच पोटाच्या भारावर पडून गतप्राण झाली असावी. असा अंदाज त्याला आला पण अर्जुनचे काय? त्याने असा टोकाचा निर्णय का घ्यावा. अर्जुन तसा वाघासारख्या निधड्या छातीचा. विद्यार्थीदशेपासूनच खूप उन्हाळे-पावसाळे सोसलेला. बिनापुस्तकाने वर्गात आला म्हणून गुरुजीने ’गेट आऊट’ म्हणताच “गुरुजी, मी काही वर्गात बेडाबिस्तर घेऊन मुक्कामाला आलेलो नाहीये. ५ वाजले की जाणारच आहे. पण प्रथम मला हे सांगा की, पैशाअभावी पुस्तक घेतले नाही हा काय मोठा गुन्हा ठरतो? तुम्ही मला अभ्यासाचे प्रश्न विचारावे, मी उत्तर देऊ शकलो नाही तर अवश्य ’गेट आऊट’ होईन. पण पुस्तक नाही म्हणून ’गेट आऊट’ हे मी मान्य करणार नाही” असे गुरुजींच्या डोळ्याला डोळे भिडवून सांगणारा अर्जुन आत्महत्या करेल, हे भरतच्या गळी उतरत नव्हतं. पण समोर वास्तव होतं.
“कालच तालुक्याला गेला होता. मुन्नीसाठी शाळेचा ड्रेस आणायला” अर्जुनचा मित्र श्रीकांत सांगत होता.
“म्हणाला की अडत्याला उसनवार पैसे मागतो. पण त्याने दिलेच नसणार. तो तरी कसा देईन? यंदाचे सर्व पीक त्याला देऊनही कर्ज फ़िटलेच नव्हते. बॅंका आणि सावकाराची तर दमडीही चुकता करू शकला नव्हता. दुकानदाराने किराणा तर कधीचाच थांबवलाय. गेल्या वर्षी कोरडा आणि यंदा ओला दुष्काळ.”
                        मुन्नी. अर्जुनला दोनच मुली. मुन्नी मोठी, आठवीत शिकत असलेली आणि शब्दाली लहान, जेमतेम अकरा महिन्यांची.
                          मुन्नीला ड्रेस एकच. तोच शाळेचा आणि तोच घरी वापरायचा. सातवीची शाळा सुरू झाली तेव्हा घेतलेला. मुन्नीने ड्रेसचे नाव काढले की तिला १५ ऑगष्ट सांगायचा, नंतर दिवाळी सांगायची. दिवाळी उलटून गेली की २६ जानेवारी सांगायचे. असाच नित्यक्रम चालला होता दीड वर्षापासून. आणि एवढे दिवस निभावूनही नेलेत. पण आता ड्रेसच्याच आयुष्याने दगा दिला. विहिरीचे पाणी भरतेवेळी घागर उचलताना चर्रकन उभी रेघ घेऊन शर्ट फाटलं. तशी मुन्नीही समजदार, सुईदोरा घेऊन तिने लगेच शिवून घेतलं. पण ते शर्ट तिला घराबाहेर पडू देईना. चारचौघीत मिसळू देईना, शाळेतही जाऊ देईना.
तेव्हा अर्जुन म्हणाला होता.
“अगं मी नाहीतरी २६ जानेवारीला घेणारच होतो. आता २४ तारखेला तालुक्याला गेलो की आणतोच बघ.”
                        पण नियतीला हे मंजूर नसावे. सारे प्रयत्न विफल ठरले होते, आणि तो तालुक्याहून रिकाम्या हाताने परतला होता.
                          हे सर्व कळलं आणि भरतचं हृदय भरून आलं. त्याला टाहो फोडावासा वाटला. धाय मोकलून गडबडा लोळावंस वाटलं. पण त्याची प्रतिष्ठा आडवी होऊन त्याला तसं करू देईना. क्षणभर त्याला वाटलं की हे सर्व खोट्या प्रतिष्ठेचे बुरखे टराटरा फाडून फेकून द्यावे आणि यथेच्छ रडून घ्यावे, अगदी मन हलके होईस्तोवर. पण त्याने परत एकदा स्वतःला सावरले. भावनेवर ताबा मिळाल्याचे बघून हळूच श्रीकांतला विचारले.
“शब्दाली कुठाय?”
श्रीकांत काहीच बोलला नाही, बाजूच्या एका खोलीकडे चालायला लागला.
शब्दाली… ११ महिन्याची पोर ती. तिला नर्मदाकाकू मांजरीच्या पिलासोबत खेळवत होत्या. शब्दालीने त्या पिलाच्या मिशा धरल्या की ते पिलू मान हलवायचे. आणि मनीम्याऊची मान हलतांना पाहून शब्दाली खदखदा खिदळायची.
                         हे दृश्य पाहून परत एकदा भरतच्या मनात कालवाकालव झाली. हिला सांगायला हवे की तिच्या डोईवरचे सर्व छप्पर उडून गेले आहे. ती अनाथ झाली आहे, पोरकी झाली आहे. आज शब्दाली दोन्ही पंखांनी उघडी पडली आहे. हे कुणीतरी शब्दालीला सांगावे असे त्याला वाटले. पण हे सांगायचे कसे?
शब्दात सांगावे तर तिचे कान ग्रहण करण्याच्या योग्यतेचे नव्हते.
डोळ्यांनी दाखवावे तर दृश्याचे पृथक्करण करून मेंदूस अर्थ पुरवण्याइतपत तिच्या जाणीवा पक्व नव्हत्या.
मग तिला श्वसनेंद्रियामार्फ़त गंधवार्ता तरी कळली असावी का?
जडदेहातून प्राण निघून गेला की मग केवळ प्रेतच उरत असते. प्रेताचे वय जसजसे वाढत जाते तसतशी प्रेतातून निघणार्‍या गंधाची तीव्रताही वाढत जाते. आणि त्या गंधाला स्वत:ची अशी एक ओळखही असते.
मग तो गंध तरी शब्दाली पर्यंत वार्ता घेऊन आला असेल काय?
नाहीच. कारण शब्दालीच्या जाणीवांची क्षमता एकतर या सर्व जाणीवांच्या अलीकडे किंवा पलीकडे तरी असणार. आता भरतलाही पुन्हा एकदा भरून आले, आणि तो पुटपुटला.
“अरे कुणी तरी तिची आईबाबांसोबत शेवटची भेट करून द्या रे…….”
आणि आतापर्यंत खिदळत असलेली शब्दाली जोराने रडायला लागली. पण तिच्या रडण्याचे कारण तिला आईबाबांच्या निधनाची वार्ता कळली म्हणून नव्हते तर भरतने मोठ्याने फोडलेल्या कर्णभेदी टाहोला दचकून घाबरल्यामुळे होते.
“अरे कुणी तरी शब्दालीची आईबाबांसोबत शेवटची भेट करून द्या रे…….” असे भरत शब्दात पुटपुटायला गेला आणि यावेळेस त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्याऐवजी एक कर्णभेदी टाहोच बाहेर पडला होता.
…………………………..*  गंगाधर मुटे  *……………………………..

खरेच बियाणे वांझ होते ?

खरेच बियाणे वांझ होते … ?

“भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?”


                  बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची…पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
                  भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
             बीजाला उगवता आले नाही कारण मातीत ओलावा नव्हता. आणि मातीत ओलावा तयार होण्यात न होण्यात बीजाचा दोष तो काय?
            पाऊस पाडला नाही हा दोष मेघांचा. दोष मात्र मढला जातो बीजाच्या माथ्यावर.
मेघांना दोषी ठरविण्यासाठी लागणारी हिंमत ज्यांच्याकडे नाही ते चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारून मोकळे होतात.
                                                    गंगाधर मुटे
………………………………………………………………..

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?.
                                  ’वांगे अमर रहे !’ हा लेख वाचून शर्मिला यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न नसून उत्तरच आहे असे मला वाटते.
                                 कारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी ‘ताज्या’ हून ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषीप्रधान्,अर्थव्यवस्थेचा कणा वगैरे असूनही विकसित का करू शकला नाही?.
                            विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे स्वीकारण्यापेक्षा देशातील लोकांना रुचेल आणि देशात ज्या शेतमालाची अधिक पैदावार होते त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित व्हायला पाहिजे. उदा.
१) बोरावर आधारित बोरकुट
२) लिंबावर आधारित सरबते
३) टोमॅटो सास
                                या व्यतिरिक्त अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे पण या सर्व पदार्थांना देशी सुगंध हवा, तरच ते लोकांच्या पसंतीस उतरेल.सामान्य लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारले तरच त्याची किंमतही आटोक्यात राहू शकते,वेगवेगळ्या भागात स्थानिक शेतमालाची उपलब्धता आणि त्या भागातील लोकांची रुची लक्षात घेऊन पाऊल टाकावे लागेल.
हे सर्व उद्योग मोठ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करून उपयोगाचे नाही कारण त्यामुळे शेतकर्‍यांना अथवा बेरोजगारांना फायदा होणार नाही.
मागे बायोडिझेल निर्मिती बद्दल बरीच चर्चा झाली.जेट्रोपा लागवड उपयोगी ठरली असती.
                                  शेती विषयक तंत्रज्ञानामध्ये लहान-लहान देश पुढे-पुढे जात असताना आमचा भल्ला मोठा देश मागे-मागे का पडतो?. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत असताना आम्ही या विषयात अजून पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही वाटत नाही. कदाचित असे तर नाही की उगीच माथापच्ची करून नवनिर्माण करत बसण्यापेक्षा इतरांनी विकसित केलेले तंत्रज्ञान चोरून-लपून मिळवायचे,त्यात जुजबी फेरबदल करायचे आणि मेड इन इंडिया असा शिक्का मारला की आम्हीही जगाच्या समांतरच आहो हे भासविण्याचा सरळसोट ‘शॉर्टकट’ आम्ही निवडलाय?. हा माझा दावा नाही उगीच शंका आहे,परमेश्वर करो आणि माझी शंका खोटी ठरो.
                              तरी एक प्रश्न कायमचा कायमच राहतो,आम्ही त्यादिशेने पावले का टाकीत नाही?. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही?.
                              भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे असे मी म्हणतो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो,तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणून म्हणतो.पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार,त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार… ही यादी किती लांब आहे देवच जाणे.
देशाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून स्वयंप्रेरणेने ‘भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारिक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटत असते..
                        ”कृषीक्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा” मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतो परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा दिवाळीचा सन म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्त्व खाऊन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळताना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
                            मग ज्या देशात शेतीक्षेत्र एवढे दुर्लक्षित असेल त्या देशात स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इंडस्ट्री सारख्या इंडस्ट्रीज कशा उभ्या राहतील?. या ठिकाणी एखाददुसरे किंवा तुरळक उदाहरण नव्हे तर व्यापकतेने देशातील ८० % जनतेचा विचार करावा लागेल. कारण पाचपन्नास युनिट उभारल्याने देशाचा प्रश्न सुटणार नाही.
                           त्याशिवाय अशी प्रक्रिया युनिट्स उभारायला स्किल्,कौशल्य,व्यावसायज्ञान,अनुभव,आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ लागेल. आमच्याकडे मनुष्यबळ सोडलं तर बाकी गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. मनुष्यबळ आहे पण त्यात बुद्धिबळ कमी आणि बाहूबळ जास्त आहे. जे काही बुद्धिबळ आहे त्यात व्यवहारज्ञान/व्यावसायिक ज्ञान कमी आणि पुस्तकी किंवा कारकुनी ज्ञान जास्त आहे. म्हणून कारखाने काढायला कोणी समोर येत नाही पण कारखाना निघणार म्हटल्यावर रांगा लागतात. याला आजचे युवक अजिबात जबाबदार नाहीत,असलोच तर आम्ही प्रौढ मंडळी जबाबदार आहोत. आमची शिक्षणपद्धती जबाबदार आहे.आजची शिक्षण प्रणाली म्हणजे कारकून घडवणारे आणि बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने ठरले आहेत.शाळा कॉलेज किंवा उच्च शिक्षणाचे मुख्य सूत्र ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल एवढे ताकदवार असायला हवे.याबाबतीत वैद्यकीय शिक्षणाचा ‘मॉडेल’ म्हणून उपयोग होऊ शकतो.मला वाटते की कदाचित ‘डॉक्टर’ हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो. बाकी क्षेत्रासाठी आपण एवढी आत्मविश्वास देणारी शिक्षणप्रणाली जर अमलात आणली तर आज गंभीर वाटणारे प्रश्न अत्यंत सुलभ होऊ शकतात.दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
                           या देशावर वसाहतवादी राज्यसत्ता चालविण्यासाठी इंग्रजांना कारकुनांची गरज होती त्यानुरुप कारकून तयार करणारी शिक्षणप्रणाली त्यांनी स्थापित केली.आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत.
                                शाळा कॉलेज शिकताना विद्यार्थी,त्याचे पालक,शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते,त्याने शिकून सवरून या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे.अगदी कलेक्टर पासून चपराश्यापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकून व्हायचं.३ % नोकरीच्या जागा असताना १०० % विद्यार्थ्यांना आम्ही एकाच मार्गाने ढकलतो.किमान ५० % विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायला काय हरकत आहे?.
                            यासंदर्भात ‘राजा हरिश्चंद्राचे’ उदाहरण फारच बोलके आहे. राज्य गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा म्हणून राजा हरिश्चंद्र मजुरांच्या बाजारात जाऊन उभा राहिला.तुला काम काय करता येते ? या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते,याला चालवायला द्यायला?. राजा हरिश्चंद्रास कामच मिळेना. शेवटी स्मशानात राहून प्रेताची रखवाली करावी लागली.
राज्य चालविण्याखेरीज इतर कसलेच कौशल्य नसलेला राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालविण्या खेरीज कसलेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्यात फरक काय उरतो?
                        डिग्री घेऊन १०० विद्यार्थी बाहेर आले की त्यात ३ लोकांना नोकरी मिळते,ते मार्गी लागतात.उरलेले ९७ नोकरीच्या शोधात भटकत फिरतात. कारण १५-२० वर्षे शाळा कॉलेजात घालवूनही व्यवसाय,स्वयंरोजगार वा अन्य उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य,व्यावसायिक ज्ञान आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास यापैकी त्याच्याकडे काहीही आलेले नसते. उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर बँका कर्ज देत नाही कारण बँकेला माहीत असते हा शंभराचे साठ करणार. म्हणून बँका टाळाटाळ करतात.पदवी मिळवल्याने व्यवसायज्ञान मिळाले हे बँकेलाही मान्य नसते.
                       शेवटी एक दिवस घरात खायचे वांदे पडायला लागलेत किंवा लग्नाचे वय घसरायला लागले की मग मिळाला तो रोजगार करण्याशिवाय गत्यंतर नसते आणि आमच्या तरुणाईचे खच्चीकरण होते.त्यासोबतच असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर काढण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरते.
                     हे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल.. 
वरना कुछ नही होनेवाला…… असंभव….!
.
                                                                                   गंगाधर मुटे
………………………………………………………………………………………………………….

हा देश कृषीप्रधान कसा?

हा देश कृषीप्रधान कसा?
- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवी शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातूर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.
                                   मी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही. बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले तरी कोणी पटवून घेईल? नाहीच घेणार. कारण स्पष्ट आहे. वर उल्लेखिलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ असल्यातरीही त्यांच्या कौतुकासाठी मी वापरलेली शब्दविशेषणे अतिशयोक्तिपूर्ण आहेत. या तर्‍हेच्या भाषाप्रयोगाने संबंधित व्यक्तीचे कौतुक होण्यापेक्षा उपहासच होत असते. आणि असे गुणगौरव करणारा एकतर वेडसर किंवा निष्कारण गोडवे गाणारा “भाट” ठरतो.
                            मग जर हे खरे असेल तर जेव्हा जेव्हा “भारत हा कृषिप्रधान देश आहे” किंवा “शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे” असे म्हटले जाते तेव्हा नेमके काय अपेक्षीत असते? कौतुक की उपहास?
भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी देशाचा पोशिंदा आहे वगैरे-वगैरे बरेच काही बोलले जाते पण…..
                                   या देशाला कृषिप्रधान मानावे अशा कुठल्याही पाऊलखुणा प्रतिबिंबित होताना दिसत नाहीत, या देशातल्या राजकीय नेत्यांच्या डोक्यात शेतकरी प्रथमस्थानी कधीच नव्हता,आजही नाही. बुद्धिप्रामाण्यवादी,थोर-महान विचारवंताच्या वैचारिक बैठकीचा केंद्रबिंदू “शेती आणि शेतकरी” कधीच नव्हता, आजही नाही. मग हा देश कृषिप्रधान कसा?.
टीव्ही मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
वृत्तपत्रात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
लोकसभा/राज्यसभा अधिवेशनात शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
संसदेत पुढार्‍यांच्या भाषणामध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
अंदाजपत्रकीय ऐकून खर्चामध्ये मध्ये शेती हा विषय किती? या विषयाचा नंबर कितवा?
                                   एवढे जरी लक्षात घेतले तरी भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे,असे म्हणण्याचे कोणी धाडस करेल असे मला वाटत नाही.
                                   भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे असे मी सुद्धा म्हणायचो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो…..?  तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणून म्हणतो. पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार, त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार…. ही यादी किती लांब आहे देवच जाणे.
”कोणीतरी म्हणतंय म्हणून मीही म्हणतो” असेच ना? स्वत:च्या अक्कलहुशारीने कोणताही विवेकशील मनुष्य भारत देशाला ’कृषिप्रधान देश’ म्हणण्याचे धाडस करेल याला काहीही तार्कीक आधार दिसत नाही.
                                      देशाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून स्वयंप्रेरणेने ‘भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारिक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटायला हवे. पण तसे होत असताना दिसत नाही.
“कृषीक्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा” मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतोय परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा “दिवाळीचा सन” म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्त्व खाऊन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळताना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
आणि जर का हे खरे असेल तर शेतकर्‍याला “देशाचा राजा” म्हणणे म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टाच नाही काय?
ही शेतकर्‍यांची मानसिक छळना आहे असे मला वाटते.
या देशात जसे काही लोक शेतीवर उपजीविका करतात तसेच या शेतीमुळेच अनेकांना आत्महत्याही करावी लागते.
असा विचार करता “भारत हा कृषिमरण देश आहे” हे जास्त संयुक्तिक नाही का?
मग
“सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हा जर उपहास/व्यंग असेल तर “भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे सुद्धा उपहास/व्यंगच.
आणि
“भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे जर खरेच असेल तर “सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हेही खरेच.
उगीच वेगवेगळे मापदंड नकोत.
.                                                                                                   गंगाधर मुटे
//////////////////////////////////////////////////////////////////////////////