केंद्रसरकारचे दहन

शेतकरी संघटनेने केले

केंद्रसरकारचे दहन


              केंद्रसरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकर्‍यांभिमुख असावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने वारंवार लावून धरलेली आहे, जेणेकरून खुल्या अर्थव्यवस्थेचा फ़ायदा शेतकर्‍यांनाही मिळू शकेल. परंतु शेतमालाला बरे भाव मिळण्याची चिन्हे दिसत असतानाच वारंवार केंद्रशासनाचा शेतकरी द्वेष जागा होतो. 

              यावर्षी आधीच कापसाचे भाव कमी असतानासुद्धा काही राज्यातील मतदान संपल्याबरोबर केंद्रसरकारच्या वाणिज्य व वस्त्रोद्योग मंत्रालयाने अचानक “दरवर्षीप्रमाणे यंदाही” निर्यात बंदीची घोषणा केली आणि देशांतर्गत कापसाचे भाव पाडण्याचा कट रचला. त्यामुळे त्याचा परिणाम कापूस बाजारावर होऊन कापसाचे भाव गडगडले आणि व्यापार्‍यांनी कापसाची खरेदीही थांबवली.

              आधीच कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला असतांना आणि कापूस उत्पादक प्रदेशात शेतकरी आत्महत्त्यांनी थैमान घातलेले असताना केवळ गिरणीमालकांना कापूस स्वस्तात मिळावा, या एकमेव उद्देशाने केंद्रसरकारने गिरणीमालकांच्या सोईचा निर्णय घेऊन शेतकर्‍यांचा पुन्हा एकदा विश्वासघात केलेला आहे.

              या कापसाच्या निर्णय बंदीचा निषेध करण्यासाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतिने दि. ७ मार्च रोजी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, महात्मा गांधी पुतळ्यासमोर “केंद्रसरकारचा प्रतिकात्मक पुतळा” जाळून होळीचा सण साजरा केला आणि निषेध नोंदविला. आंदोलनाचे नेतृत्त्व माजी आमदार सरोज काशीकर, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, मधुसुदन हरणे यांनी केले. 

              शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी न करता तातडीने कापूस निर्यात बंदी उठवावी आणि कापसाच्या अधिक गाठीच्या निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यामार्फ़त केंद्र सरकारला सादर केले.

              शिष्टमंडळात माजी आमदार सरोज काशीकर, शैलजा देशपांडे, गंगाधर मुटे, मधुसुदन हरणे, सचिन डाफ़े, संध्या राऊत, सुनंदा तुपकर, सतिश दाणी, सुभाष बोकडे, निळकंठ घवघवे, प्रभाकर झाडे आदींचा समावेश होता.
*  *  *  *
*  *  *  *
*  *  *  *
———————————————————————————————————–

स्टार माझा बातमी

धुंद रवी यांचेवर प्राणघातक हल्ला

मित्र-मैत्रिणींनो,

एक वाईट बातमी आहे. आंतरजालावरील लोकप्रिय लेखक धुंद रवी आणि त्यांचे कुटुंबियांवर महिन्यापुर्वी प्राणघातक हल्ला झाला. ही बातमी आज मला कळली. धुंद रवी आणि त्यांचे आई-वडील आणि बहिण यांच्यावर कोयत्याने वार झाले आणि झालेल्या जखमा खुप गंभीर स्वरुपाच्या होत्या.

पण दिलासा देणारी बाब एवढीच की ते मृत्युशी झुंज देऊन आता सावरताहेत.

आयुष्य पुर्णपणे सुरळीत व्हायला बराच काळ जाईल.

परमेश्वर त्यांना लवकरात लवकर संपूर्ण स्वास्थ प्रदान करो, ही सदिच्छा.

बातमी इथे जोडलीये.Dhund Ravi

कापूस व धान उत्पादक परिषद – सचित्र वृत्तांत

कापूस परिषद
* * * * * * * * *


विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषद – सचित्र वृत्तांत

सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०११ 
 - गोकुलधाम मैदान * 
- दुपारी १२ वाजता, 
- हिंगणघाट (जि. वर्धा) 
 * * * * * * * * *
शेतकरी 
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 * * * * * * * * *
हिंगणघाट 
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 * * * * * * * * *
लोकमत 
लोकमत बातमी ०८ नोव्हे २०११ 
* * * * * * * * *
kisan 
मा. शरद जोशी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून परिषदेची सुरूवात करण्यात आली. 
* * * * * * * * *
baliraja 
परिषदेला दहा हजारावर शेतकरी उपस्थित होते. 
* * * * * * * * *
cotton
व्यासपिठावर डावीकडून शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. शैलजा देशपांडे, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रांताध्यक्षा माजी आमदार सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते, दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग, माजी अध्यक्ष राम नेवले. 
 * * * * * * * * *
देशोन्नती

देशोन्नती बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
shetkari
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक भाषण आणि परिषदेचे संचालन केले.
* * * * * * * * *
agri
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप
* * * * * * * * *
हितवाद
हितवाद बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
कापूस
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग
* * * * * * * * *
धान
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
तरुण भारत
तरुण भारत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
कापूस व धान उत्पादक परिषद
शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी
* * * * * * * * *
बळीराजा

दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
सकाळ
सकाळ बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शरद जोशी
दुसर्‍या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक मा. शरद जोशी
* * * * * * * * *
शेतकरी संघटना
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
लोकसत्ता
लोकसत्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
गंगाधर मुटे
शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते मा. शरद जोशी
* * * * * * * * *
हिंगणघाट
शेतकर्‍याला सुखाने व सन्मानाने जगता यासाठी प्रयत्न करण्याची सर्वांनी शपथ घेतली.
* * * * * * * * *
किसान संघटन
उपस्थित जनसमुदाय.
* * * * * * * * *
लोकशाही वार्ता
लोकशाही वार्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *
रेलरोको

सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* * * * * * * * *

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

श्री शरद जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
                    मुंबईतील ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्थेच्या या वर्षीच्या सामाजिक क्षेत्रासाठी असलेल्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी, निवड समितीने शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांची निवडक केली आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्‍यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, त्या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानच्या यंदाच्या सामाजिक ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी श्री. शरद जोशींची निवड करीत असल्याचे निवड समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

                   शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार या निवडीमागे असल्याचे समितीने म्हटले आहे.

                        डॉ. अरुण टीकेकर अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले.

                         मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरकार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला आहे.

                       हा पुरस्कार स्वीकारण्यास श्री. शरद जोशी यांनीही सानंद संमती दिली असून डिसेंबर २०११ मध्ये मुंबईत होणार्‍या चतुरंग रंगसंमेलनात श्री. शरद जोशी यांना तो प्रदान करण्यात येईल.

——————————————————————————————————

स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo





स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo

स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.

———————————————————————–

———————————————————————–
अन्य व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

———————————————————————–

………………………………………………………………………………….

गझलोत्सव – २०११

गझलोत्सव- २०११
अमरावती येथील संत ज्ञानेश्वर संकुलात दिन. ०९-०१-२०११ रोज रविवारला बांधण जनप्रतिष्ठान आणि सुरेश भट स्मृती प्रतिष्ठान यांचे सयुंक्त विद्यमाने ४ था गझलोत्सव – २०११ संपन्न झाला.
त्याप्रसंगाची काही क्षणचित्रे.
……………………………………..

Gazal

दीप प्रज्वलीत करताना मा. सुशीलकुमार शिंदे


……………………………………..
Gazal

संगीतकार मा.कौशल इनामदार भाषण करताना.


……………………………………..
Gazal

चित्रपट दिग्दर्शक मा. राजदत्त भाषण करताना.


……………………………………..
Gajhal

प्रसिद्ध जेष्ठ गझलकार मा. म.भा.चव्हान भाषण करताना.


…………………………………….
गझल

मा. सुशीलकुमार शिंदे यांचे हस्ते जेष्ठ गझलकार मा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना मा. डॉ. श्रीकृष्ण राऊत


……………………………………